Neelam Gorhe : आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते – नीलम गोऱ्हे

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत आज सकाळी प्रसारित झाली. त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांकडून त्यावर टीकास्त्र करण्यात आलं आहे.

Neelam Gorhe : आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते - नीलम गोऱ्हे
आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते - नीलम गोऱ्हे
Image Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 1:24 PM

पुणे – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवस निमित्त त्यांचे वय जितके होते आहे. तितका म्हणजे 62 किलोचा प्रसाद आज दाखवला. सेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांनी आज दगडुशेठ गणपतीला (Dagdusheth Ganpati) आरती केली. देशाची सेवा करण्यासाठी उद्धवजी यांना यश मिळो. देवाने त्यांना शक्ती आणि युक्ती द्यावी ही गणेशाला माझ्याकडून प्रार्थना आहे. बाळासाहेबांचे वाक्य मी ऐकल आहे की, देवाच्या देवळात येताना राजकारणाचे जोडे बाहेर काढून यायचे असतात. त्यामुळे आम्ही कोणाच्याही विरोधात जाऊन आरती करत नाही. राजकीय मतभेद असतील तरी सुद्धा ते देवाच्या दारात नाही असं शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सांगितले.

राजकारणातील लोकांना परिपक्व बुद्धी असली पाहिजे

आदित्य ठाकरे यांचे दौरे पाहता बाळासाहेब यांच्या दौऱ्यांची आठवण येते आहे. शिवसैनिकांच्या मनामध्ये काय आहे ते ओळखूनच उद्धव ठाकरे बोलत असतात. जे मनात आहे तेच व्यक्त करण्याची परंपरा बाळासाहेबांपासून आहे. कुठलाही नेता ज्याच्या मनात जे असतं तेच बोलत असतो. म्हणूनच तो नेता असतो हे राजकारणातील लोकांना परिपक्व बुद्धी असली पाहिजे. शिवसेना हे सत्तेत असो किंवा नसो शिवसेना सगळ्यांनाच मदत करत आहे.

बावनकुळे यांना जी दिव्यदृष्टी प्राप्त झाली

बावनकुळे यांना जी दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांना मातोश्रीच्या आतमध्ये काय आहे ते दिसत आहे. ऊर्जामंत्री असल्यामुळे त्यांनी काही यंत्र बसवला असावा अशी टीका बावनकुळे यांच्यावरती नीलम गोऱ्हे यांनी केली. पुण्यात चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. त्यामुळे गृहविभागाला पत्र द्यायचं आहे. मात्र मंत्रीमंडळाचा विस्तार न झाल्याने अडचण निर्माण होते आहे असंही त्यांनी मीडियाला सांगितले.

भाजपला शिवसेना संपवायची आहे

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत आज सकाळी प्रसारित झाली. त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपाच्या अनेक नेत्यांकडून त्यावर टीकास्त्र करण्यात आलं आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांवर त्यांच्या शैलीत टीका केली आहे. तसेच भाजपला शिवसेना संपवायची आहे असा देखील आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.