Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana : पक्षामुळेच नाही, तर निवडणूक जिंकण्यासाठी लायकीही लागते, आदित्य ठाकरेंच्या टिकेला आ. संजय गायकवाडांचे उत्तर

शिवसेनेत फूट ही राज्यातील जनतेच्या दृष्टीने चांगली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. असे असतानाही ठाकरे कुटुंबियांबद्दल कोणताही आमदार हा खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत नाही. असे असताना मात्र, आदित्य ठाकरे हे सातत्याने आमच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे गायकवाडांनी सांगितले आहे. असेच सुरु राहिले तर मग आमच्या सहनशीलतेचा अंत होईल असेही ते म्हणाले आहेत.

Buldhana : पक्षामुळेच नाही, तर निवडणूक जिंकण्यासाठी लायकीही लागते, आदित्य ठाकरेंच्या टिकेला आ. संजय गायकवाडांचे उत्तर
आदित्य ठाकरे आणि आ. संजय गायकवाड
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 2:56 PM

बुलढाणा : हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम ठेवण्यासाठी शिवसेनेतील आमदारांनी एक उठाव केला आहे. हिंदुत्व जोपासयाचे असते तर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबत बसलेच नसते. त्यांच्यासोबत बैठका आणि त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होत असतानाही घेतलेली भूमिका हिंदुत्वाची प्रतारणा करणारी नाही का? असा सवाल (MLA Sanjay Gaikwad) आ. संजय गायकवाड यांनी (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांना विचारलेला आहे. आ. आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या दरम्यान शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असून भविष्यात दंगलीही घडवल्या जातील अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. याला उत्तर देताना आ. संजय गायकवाड यांनी हिंदुत्वाची जोपासणा कोण करतंय हे सर्व (Maharashtra) महाराष्ट्राला माहिती झाले आहे. शिंदे गटच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात असल्यााचे सांगत निवडूण येण्यासाठी केवळ पक्षच महत्वाचा असे नाहीतर त्या उमेदवराचे वजनही तेवढेच महत्वाचे असल्याचे सांगितले आहे.

निवडणुक जिंकण्यासाठी पक्षाचे योगदान कमीच

आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने आरोप होत आहे की, पक्षाचे लेबल काढून तु्म्ही निवडून येऊन दाखवा. या टीकेला आतापर्यंक कोणी उत्तर दिले नव्हते पण संजय गायकवाड यांनी मात्र, निवडणुक केवळ पक्षाच्या जीवावर होत नाहीतर स्थानिक पातळीवर उमेदवराचे वर्चस्व आणि योगदान यावरच सर्वकाही अवलंबून असते. उमेदवाराच्या निवडूण येण्यामध्ये पक्षाचे योगदान केवळ 20 टक्के असल्याचे म्हणत त्यांनी केवळ पक्षाच्या जीवावर निवडून येऊन दाखवा असे आव्हानही त्यांनी आदित्य ठाकरे यांना केले आहे.

एकीसाठी कायम प्रयत्न, पण सर्वकाही निष्फळ

शिवसेनेत फूट ही राज्यातील जनतेच्या दृष्टीने चांगली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र यावेत यासाठी सर्वकाही प्रयत्न केले. असे असतानाही ठाकरे कुटुंबियांबद्दल कोणताही आमदार हा खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत नाही. असे असताना मात्र, आदित्य ठाकरे हे सातत्याने आमच्या विरोधात भूमिका घेत असल्याचे गायकवाडांनी सांगितले आहे. असेच सुरु राहिले तर मग आमच्या सहनशीलतेचा अंत होईल असेही ते म्हणाले आहेत. काही बोलण्यासारखे नसले की, आदित्य ठाकरे हे आमच्यावर टीका करतात. पण जनतेला माहिती आहे की, राज्याच्या हितासाठी कोण चांगल ते? असेही गायकवाड यांनी सांगितले आहे.

आदित्य ठाकरेंची टिका गायकवाडांना झोंबली

शिंदे गटाची स्वतंत्र स्थापना झाली असतानाही अजून या गटातील आमदार हे ठाकरे कुटुंबियांबद्दल सावध प्रतिक्रिया देतात. असे असतानाही आदित्य ठाकरे यांच्याकडून टीकेचे बाण हे सुरुच आहेत. हिंदू मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून दंगली घडवण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप आदित्य यांनी केला होता. त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत बैठका घेता मग ही काय हिंदुत्वाची प्रतारणा नाही का ? असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.