Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे पद आले धोक्यात, कोर्टात याचिका दाखल…

दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र, या दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील ओमप्रकाश सोलंकी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे पद आले धोक्यात, कोर्टात याचिका दाखल...
Rajasthan DCM Diya Kumari and Premchand Bairwa
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 6:58 PM

जयपूर | 18 डिसेंबर 2023 : राजस्थानमध्ये 200 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने 115 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले. तर, काँग्रेसला केवळ 69 जागांवर समाधान मानावे लागले. राजस्थानमधील विजयानंतर भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री म्हणून समोर आणले आहे. तर, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री केले. परंतु, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शपथेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी शुक्रवारी जयपूरमधील अल्बर्ट हॉलसमोर आयोजित शपथविधी कार्यक्रमात भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री आणि दिया कुमारी, प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र, याच शपथेवरून दोन्ही उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

राजघराण्यातील दिया कुमारी यांच्यासह डॉ. प्रेमचंद बैरवा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आदींनी दिया कुमारी यांना मिठाई खाऊ घालून त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी दिया कुमारी यांनी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा आशीर्वाद घेतला होता.

दिया कुमारी यांनी शुक्रवारीच संध्याकाळी औपचारिक पूजेनंतर सचिवालय कार्यालयात पदभार स्वीकारला. दुसरे उपमुख्यमंत्री डॉ. प्रेमचंद बैरवा हे जयपूरच्या दुडू मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अनुसूचित जातीचे ते प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी डॉक्टरेटची पदवी मिळवली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही उपमुख्यमंत्री पीएचडीधारक आहेत.

हे सुद्धा वाचा

जयपूरचे वकील ओमप्रकाश सोलंकी यांनी याच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविरोधात राजस्थान न्यायालयात जनहित याचिका दाखल केलीय. ‘घटनेनुसार उपमुख्यमंत्री यासारखे कोणतेही पद नाही आणि या दोन्ही नेत्यांनी या पदाची शपथ घेतली आहे, असा आक्षेप या याचिकेतून घेण्यात आला आहे.

वकील ओम प्रकाश सोलंकी यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘राजस्थानचे दोन्ही उपमुख्यमंत्री, दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांच्याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. घटनेत उपमुख्यमंत्र्यासारखे कोणतेही पद नाही. हे राजकीय पद आहे आणि ते घटनाबाह्य आहे असे ते म्हणाले.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.