Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे मुख्यंत्रीपदाचा राजीनामा देणार? अजितदादा मुख्यमंत्री होणार?; महाराष्ट्राला पडलेल्या दोन प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात

मुख्यमंत्री राजीनामा देणार हे पेरलं जात आहे. निगेटिव्हीटी पसरवली जात आहे. पण त्यात काही तथ्य नाही. भरत गोगावले यांनी दिलेलं भाकरीचं उदाहरण योग्य आहे. भाकरीत वाटेकरी झाल्याने एकदोन मंत्रीपदे इकडे तिकडे होतील.

एकनाथ शिंदे मुख्यंत्रीपदाचा राजीनामा देणार? अजितदादा मुख्यमंत्री होणार?; महाराष्ट्राला पडलेल्या दोन प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 2:27 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलून गेले आहेत. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या राजकीय चर्चा जोरात सुरू असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. या सर्व चर्चांवर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे.

उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला धोका नाही. अजित पवार मुख्यमंत्री होणार ही अफवा आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात इतरांचा समावेश होणार आहे. खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेतील, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

पुन्हा माघार नाही

शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटात जाणार असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. 11 महिन्यापूर्वी आम्ही मंत्री झालो. 12 महिन्यापूर्वी उठाव केला. तो कोणत्या पक्षातून झाला हे सर्वांना माहीत आहे. ज्या पक्षाविरोधात उठाव केला तिथे परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. किंवा त्यांनी आमच्याकडे येण्याचा प्रश्न नाही. 200पेक्षा अधिक आमदार देऊन युती स्थिर सरकार देणार असेल, शिंदे यांच्याच नेृत्वात निवडणुका होत असतील तर आम्हाला कुणाचीही गरज नाही, असं उदय सामंत यांनी ठणकावून सांगितलं.

त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाही

राजकारण करताना टीका सुरू होती, शिवीगाळ सुरू होती आणि वैयक्तिक बदनामी सुरू होती. एकनाथ शिंदे आणि आमच्यावर वैयक्तिक टीका केली जात होती. दोन महिन्याने सरकार पडणार, तीन महिन्याने सरकार पडणार अशी तारीख डिक्लेअर केली जात होती. सरकार काही पडलं नाही. अजित पवार आमच्या युतीत सामील झाले. ते आल्यावर ते मुख्यमंत्री होणार… शिंदे राजीनामा देणार… हे जे कोणी पिकवतंय त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणुका

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात निवडणुका होतील हे स्पष्ट केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तेच सांगितलं. मुख्यमंत्रीपदाला धोका असल्याचं सांगून नकारात्मक गोष्टी पसरवल्या जात आहेत. जे घडलंच नाही. ते घडलं म्हणून क्रिएट करणं योग्य नाही. हा लोकशाहीतील घाणेरडा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्यांचेच आमदार संपर्कात

ठाकरे गटाच्या 13 पैकी 6 आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यातील तीन चार आमच्या आमदारांनी मला फोन केला. मुंबईऐवजी इतर राज्यात भेटू असं त्यांनी सांगितलं. चर्चा होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं. त्यामुळे विनायक राऊत यांनी सांगितलेला आकडा त्यांच्याबाबतीतील खरा आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.