Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Survey : मतदारांचा रोष नेमका कोणावर? केंद्र की राज्य सरकार, कोण तोफेच्या तोंडावर..

Survey : मतदारांचा रोष नेमका कोणावर अधिक असतो, केंद्र सरकार की राज्य सरकारवर..

Survey : मतदारांचा रोष नेमका कोणावर? केंद्र की राज्य सरकार, कोण तोफेच्या तोंडावर..
मतदारांचा रोष कोणावर?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 9:51 PM

नवी दिल्ली : भारतीय संघराज्याच्या (Union of India) रचनेत केंद्र आणि राज्य सरकारचे (State Government) स्थान अतिमहत्वाचे आहे. पण सध्याचे राजकारण, महागाई, समस्या पाहता सर्वाधिक रोष कोणावर दिसून येतो? केंद्र सरकारवर (Central Government) रोष निघतो की राज्य सरकारवर मतदार रोष काढतो? या प्रश्नाची उत्तरे एका सर्व्हेतून समोर आली आहेत..काय सांगतो आहे हा सर्व्हे..

2014 पासून देशात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये पक्षनिहाय संबंध ताणल्या गेल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर असल्यास हे संबंध ताणल्या जात नाहीत. परंतु, केंद्राच्या विरोधातील पक्षांचे सरकार राज्यात सत्तेवर असल्यास हा वाद उफाळतो.

सध्या देशातील राजकारण सरळसरळ भाजप आणि भाजपविरोधी पक्षात विभागल्या गेले आहे. 2014 नंतर हे ध्रुवीकरण झाले. 2019 नंतर मात्र हा वाद मोठ्या प्रमाणात समोर आला. अनेक राज्यात सरकार उलथवण्याचे प्रकार घडले आणि भाजपविरोधातही जोरदार हल्लाबोल वाढला आहे. मतदारांना ही गोष्ट स्पष्टपणे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

IANS आणि C Voter ओपिनियन पोलद्वारे एक सर्व्हेक्षण झाले. त्यात केंद्र सरकार की राज्य सरकार यापैकी त्यांचा रोष नेमका कोणावर आहे, याचा उलटतपास करण्यात आला. मतदारांचा सर्वाधिक रोष नेमका कोणावर जास्त निघतो, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या सर्व्हेनुसार, 46.6 टक्के मतदार हे त्यांच्या राज्य सरकारवर नाराज आहेत. तर 34.8 मतदार हे केंद्र सरकारवर नाराज असल्याचे समोर आले आहे. या सर्व्हेनुसार, 24.6 टक्के मतदार त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर तर 17.9 मतदार पंतप्रधानांवर नाराज आहेत. राज्य सरकारपेक्षा केंद्राची धोरणे आणि नीतींवर लोक अधिक नाराज आहेत.

कोविड काळात राज्य सरकारांनी केंद्र सरकारच्या एककल्ली धोरणांवर जाहीर टीका केली होती. तसेच केंद्र सरकार अनेक मुद्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप राज्यांनी केला होता. त्यानंतर केंद्रापेक्षा आता राज्यांवर मतदार नाराज असल्याचा दावा या सर्व्हेक्षणात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा.