राज्यात आम्हाला दहा जागा द्याव्यात, रामदास आठवले यांची मागणी

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची बीड येथे रॅली झाली. यावेळी त्यांना मराठा आरक्षणाला आपला पाठींबा असला तर ओबीसींवर देखील अन्याय होता कामा नये अशी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

राज्यात आम्हाला दहा जागा द्याव्यात, रामदास आठवले यांची मागणी
ramdas athawale
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 9:39 PM

शरद पवार यांनी आरक्षण 75 टक्क्यांपर्यंत नेले पाहीजे अशी मागणी केली आहे. परंतू मनमोहन सिंह यांचे सरकार असताना काही मर्यादा वाढविली असा सवाल केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. शरद पवार चार वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी आरक्षण मर्यादा का नाही वाढविली असाही सवाल रामदास आठवले यांनी केला आहे.

बीड येथे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची रॅली झाली. यावेळी भाषण करताना रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. भारत हा 140 कोटींचा देश आहे. लोकसभा निवडणूकांच्या वेळी घटना बदलणार अशी चर्चा कॉंग्रेसने सुरु केली. मात्र कोणाचा बाप आला तर संविधान बदलता येणार नाही. आमची कळ काढणे एवढी सोपी गोष्ट नाही. आम्ही दलितांवरील अन्याय आणि बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाही असेही आठवले यांनी यावेळी सांगितले. मराठे जेव्हा आरक्षण नको म्हणत होते तेव्हा आम्ही मराठ्यांना आरक्षण देण्याची पहीली मागणी केली होती असे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. आज अनेक मराठा नेते पुढाकार घेत आहेत असेही आठवले यावेळी म्हणाले.

केंद्रात नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. मात्र आम्हाला त्यांनी महाराष्ट्रात बळ दिले पाहीजे. मराठा समाजाच्या पाठीमागे आम्ही आहोत. ओबीसी समाजाला देखील आम्हाला न्याय द्यायचा आहे. जरांगे पाटील यांची मागणी योग्य असली तरी ओबीसींवर देखील अन्याय व्हायला नको. मराठा समाजासाठी विनायक मेटे यांनी चांगले काम केले होते. मराठा समाजासाठी सतत कार्यरत असलेला नेता आज आपल्यात नाही. मला मेटे, गोपीनाथ मुंडे आणि महाजन यांची आठवण यावेळी आल्यावाचून राहत नाही असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले.

केज मतदार संघावर दावा

गेल्यावेळी 2019 मध्ये पप्पू कागदे यांचे केजमध्ये उमेदवारी साठी नाव पुढे आले. मात्र अचानक दुसऱ्याचे नाव पुढे झाले. यंदा केज मतदार संघाची जागा पप्पू कागदे यांना मिळावी अशी आमची मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. राज्यात आम्हाला दहा जागा मिळाव्यात अशी आमची मागणी असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.