Astrology : पत्रिकेतील या ग्रहांच्या युतीमुळे होते पती-पत्नीमध्ये भांडण, घरात राहते तणावाचे वातावरण

ज्योतिष शास्त्रानुसार जर पत्रिकेत गुरू शुभ असेल तर पत्नी पतीला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय स्त्रीच्या पत्रिकेत गुरू उच्च स्थानावर असेल तर पुरुषालाही धनाची प्राप्ती होते. पुरुषाच्या पत्रिकेत शुक्र चांगल्या स्थितीत असेल तर त्याला आज्ञाधारक पत्नी मिळते. याशिवाय लग्नेश आणि सप्तमेश 6व्या, 8व्या आणि 12व्या घरात असतील तर पती-पत्नीमध्ये खूप वाद होतात.

Astrology : पत्रिकेतील या ग्रहांच्या युतीमुळे होते पती-पत्नीमध्ये भांडण, घरात राहते तणावाचे वातावरण
पती पत्नीमध्ये भांडण का होतं?Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 08, 2023 | 2:25 PM

मुंबई : पती-पत्नीमधील नाते परस्पर सौहार्द आणि विश्वासावर आधारित आहे. त्यात थोडीशीही अविश्वासाची भावना निर्माण झाली आणि नात्याचे बंध कमकुवत होऊ लागतात. अनेक वेळा ग्रहस्थितीचाही पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे कुटुंबात तणाव निर्माण होतो. पती-पत्नीमध्ये खूप वाद झाल्याने कुटुंबात अशांतता आहे. ज्योतीषी पराग कुलकर्णी यांच्याकडून आपण जाणून घेऊया नवरा बायकोमध्ये भांडणं होण्यामागची नेमकी कारणे काय आहेत.

नवरा-बायको का भांडतात?

ज्योतिषशास्त्रानुसार दोघांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती पती-पत्नीमधील वाद किंवा प्रेमसंबंधांसाठी कारणीभूत असते. पंडित पराग कुलकर्णी यांच्या मते पतीचे वैवाहिक जीवन शुक्र ग्रहाच्या स्थितीवर अवलंबून असते, तर गुरू ग्रह पत्नीच्या वैवाहिक जीवनावर प्रभाव टाकतो. याशिवाय पती-पत्नीच्या कुंडलीत शनि, सूर्य, मंगळ, राहू आणि केतू यांच्यामुळेही समस्या निर्माण होऊ शकतात.

ग्रहांची युती

ज्योतिष शास्त्रानुसार जर पत्रिकेत गुरू शुभ असेल तर पत्नी पतीला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय स्त्रीच्या पत्रिकेत गुरू उच्च स्थानावर असेल तर पुरुषालाही धनाची प्राप्ती होते. पुरुषाच्या पत्रिकेत शुक्र चांगल्या स्थितीत असेल तर त्याला आज्ञाधारक पत्नी मिळते. याशिवाय लग्नेश आणि सप्तमेश 6व्या, 8व्या आणि 12व्या घरात असतील तर पती-पत्नीमध्ये खूप वाद होतात.

हे सुद्धा वाचा

ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की जर पत्रिकेतील 6व्या, 8व्या किंवा 12व्या भावात सातवा स्वामी असेल किंवा सप्तम स्वामी पाचव्या भावात असेल तर कुटुंबात अशांतता निर्माण होते. सातव्या भावात शनि, मंगळ, सूर्य, राहू-केतू यांसारखे क्रूर ग्रहांचे पैलू असल्यास पती-पत्नीमध्ये वाद होतात.

हे उपाय जरूर करून पहा

  • कुटुंबात शांती आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढण्यासाठी दररोज झोपण्यापूर्वी उशीखाली कापूर ठेवावा. सकाळी उठल्यावर हा कापूर जाळावा. असे केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम टिकून राहते.
  • शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करून गुलाबाचे फूल अर्पण करा आणि त्यानंतर हे फूल खोलीत ठेवा.
  • तुमची शयनकक्ष गुलाब आणि कंदासारख्या फुलांनी सजवा. यामुळे नात्यात प्रेम वाढेल. पण लक्षात ठेवा खोलीत कोमेजलेली किंवा जुनी फुले ठेवू नका. बेडरूममध्ये नेहमी फक्त ताजी आणि सुगंधी फुले ठेवा.
  • फेंगशुईनुसार, पती-पत्नीने आपल्या खोलीत डॉल्फिन नाचताना किंवा खेळत असल्याचे चित्र ठेवावे. यामुळे तुमच्या नात्यात आनंद येईल.
  • वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीची खोली नेहमी स्वच्छ असावी. बेडखाली कचरा, शूज, चप्पल किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका. यामुळे नकारात्मकता निर्माण होते आणि त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यावर परिणाम होतो.
  • पती-पत्नीने एकत्र मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे. दररोज शक्य असल्यास आठवड्यातून एकदा तरी एकत्र मंदिरात जावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.