Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solar Eclipse 2022: या सहा राशींवर असेल एक महिन्यापर्यंत सूर्यग्रहणाच्या प्रभाव, असे करा रक्षण

आज वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण झाले. या ग्रहणाचा कोणत्या राशीवर काय परिणाम होणार आहे जाणून घेऊया.

Solar Eclipse 2022: या सहा राशींवर असेल एक महिन्यापर्यंत सूर्यग्रहणाच्या प्रभाव, असे करा रक्षण
सूर्यग्रहण आणि राशीफळ Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 9:14 PM

मुंबई,  वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse) तूळ आणि स्वाती नक्षत्रात होते. हे आंशिक सूर्यग्रहण आज भारताच्या विविध भागात दिसले. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे सूर्यग्रहण अत्यंत महत्त्वाचे होते.  हे आंशिक सूर्यग्रहण सहा राशीच्या (Horoscope) लोकांना पुढील एक महिना त्रास देऊ शकते. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश असेल जाणून घेऊया.

  1. मेष- तूळ रास मेष राशीपासून सातव्या भावात आहे, ज्यामध्ये हे ग्रहण झाले आहे. मेष राशीच्या लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनाकडे लक्ष द्यावे लागेल. जर तुम्ही काही काम करत असाल आणि पुढच्या एक महिन्यापर्यंत त्याचे फळ मिळाले नाही तर काळजी करू नका. हा ग्रहणाचा परिणाम असू शकतो. या काळात पैशाचे व्यवहार करू नका. ग्रहणानंतर स्नान करून गुळाचे दान करावे.
  2. वृषभ- हे ग्रहण वृषभ राशीपासून सहाव्या भावात झाले आहे. वृषभ राशीच्या जातकांनी भांडणापासून दूर राहावे. उधारीचे व्यवहार टाळा. पुढील एक महिना तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. ग्रहणानंतर आंघोळ करून दोन किलो पीठ एखाद्या गरीबाला दान करावे.
  3. मिथुन- मिथुन राशीपासून पाचव्या भावात ग्रहण आहे. मिथुन राशीच्या जातकांनी वाणीवर संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी घाई करू नका. पुढील एक महिना लांब प्रवास टाळा. जर तुम्हाला नाईलाजास्तव प्रवास करावा लागत असेल तर विशेष  काळजी घ्या. ग्रहणानंतर स्नान करून हिरवी फळे गरिबांना दान करा.
  4. कर्क- हे ग्रहण कर्क राशीपासून चौथ्या भावात पडत आहे. कर्क राशीच्या जातकांनी कुटुंबात मतभेद होऊ देऊ नये. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादात पडू नका.  मनात नकारात्मक विचार आणू नका. ग्रहणानंतर स्नान करून भगवान शंकराची पूजा करावी आणि एक किलो तांदूळ एखाद्या गरीबाला दान करावे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. सिंह राशीच्या लोकांनी ग्रहण काळात शांत राहावे. रागाला आवार घालावा. बोलताना विचार करून बोलावे. ग्रहणानंतर आंघोळ करून एक किलो गुळ एखाद्या गरीबाला दान करावा.
  7. कन्या- कामाच्या ठिकाणी विनम्रतेने वागावे. मनात अहंकार ठेवू नये. पुढील एक महिना नोकरी किंवा व्यवसायात काळजीपूर्वक काम करा. घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये संयम ठेवा. ग्रहणानंतर गरिबांना अन्नपदार्थ दान करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.