Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्यदेवाच्या रथाला सातच घोडे का असतात? असे आहे यामागचे धार्मिक कारण?

हिंदू धर्मात 7 हा अंक शुभ मानला जातो. आठवडाभरातही केवळ 7 दिवस ठेवण्यात आले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सूर्यप्रकाशात सात रंग असतात. प्रिझमप्रमाणे सूर्यप्रकाश 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागतो. सूर्यदेवाच्या रथाच्या घोड्यांप्रमाणेच त्यांच्या रथाच्या चाकांनाही विशेष अर्थ आहे.

सूर्यदेवाच्या रथाला सातच घोडे का असतात? असे आहे यामागचे धार्मिक कारण?
सूर्यदेव Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 6:59 PM

मुंबई : हिंदू धर्मात सूर्याची पूजा केली जाते, ज्योतिषशास्त्रात (Astrology) असे म्हटले आहे की ज्याच्यावर सूर्यदेव कृपा करतो त्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते. भगवान सूर्य सात घोड्यांच्या रथावर स्वार होतात. सूर्याचा रथ सांभाळणार्‍या सात घोड्यांबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. जर तुम्ही नीट बघितले तर या सात घोड्यांच्या रंगात सूक्ष्म फरक आहे,अरुण देव त्यांचा लगाम सांभाळतात. हे घोडे आणि सूर्यदेव स्वतः रथाच्या मागे स्वार होतात. धार्मिक कथांनुसार या घोड्यांची नावे गायत्री, भारती, उष्णिक, जगती, त्रिस्तप, अनुस्तप आणि पंक्ती अशी आहेत. असे मानले जाते की हे सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात.

7 हा अंक विशेष आहे

हिंदू धर्मात 7 हा अंक शुभ मानला जातो. आठवडाभरातही केवळ 7 दिवस ठेवण्यात आले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सूर्यप्रकाशात सात रंग असतात. प्रिझमप्रमाणे सूर्यप्रकाश 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागतो. जेव्हा सूर्यप्रकाश प्रिझममधून जातो तेव्हा तो प्रकाश 7 वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागला जातो. इंद्रधनुष्यातही 7 रंग असतात. सूर्यदेवाचा रथ चालवणारे सात घोडे प्रकाशाच्या या सात रंगांचे प्रतीक मानले जातात. याच कारणामुळे हे सात घोडे एकमेकांपासून वेगळे दिसतात.

रथ चाक देखील विशेष अर्थ दर्शवतात

सूर्यदेवाच्या रथाच्या घोड्यांप्रमाणेच त्यांच्या रथाच्या चाकांनाही विशेष अर्थ आहे. त्याच्या रथाचे चाक 1 वर्षाचे प्रतीक मानले जाते. आणि चाकामध्ये बनवलेल्या 12 ओळी वर्षाच्या 12 महिन्यांचे प्रतीक मानल्या जातात. भारतातील कोणार्क मंदिरात सूर्यदेवाची त्यांच्या रथासह अतिशय सुंदर मूर्ती आहे जिथे तुम्ही हे सर्व पाहू शकता.

हे सुद्धा वाचा

सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची पद्धत

सूर्यदेवाला नेहमी पूर्व दिशेला जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना दोन्ही हातांनी तांब्याचे भांडे धरून डोक्यावरून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. भांड्यात पाण्यासोबत लाल फुले, कुंकू आणि तांदूळ घाला. सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्या मध्यभागी सूर्यकिरण येत असल्याचे पाहा.पाणी देताना सूर्याच्या मंत्राचा जप करावा.

सूर्याचा आशीर्वाद मिळविण्याचा मार्ग

सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान आणि ध्यान करून उगवत्या सूर्याची पूजा करावी. पहाटे उगवत्या सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सुख, सौभाग्य आणि आरोग्य लाभते, असे मानले जाते. सूर्याची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो, अशा स्थितीत सूर्याची शुभ प्राप्ती करण्यासाठी पाण्यात थोडा गूळ मिसळून उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.