Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adhikmass : अधिकमासातील पंचमी तिथी आज, या उपायांनी दूर होईल आर्थिक संकट

तिळाचे तेल वाटीत किंवा एखाद्या पात्रात घेऊन त्यात स्वःताचे प्रतिबींब पाहावे, त्यानंतर ते तेल एखाद्या गरीबाला किंवा शनि मंदिरात दान करावे. या विधीला छायादान असे म्हणतात.

Adhikmass : अधिकमासातील पंचमी तिथी आज, या उपायांनी दूर होईल आर्थिक संकट
अधिकमासImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 22, 2023 | 11:59 AM

मुंबई : हिंदू पंचांगानुसार, या वर्षी 18 जुलै 2023, मंगळवारपासून अधिक मास सुरू होत आहे. 16 ऑगस्ट 2023, बुधवारी संपेल. अधिक महिन्यांमुळे श्रावण 59 दिवसांचा असेल. अधिकमासामध्ये पंचमी (Adhikmass Panchami) तिथीला विशेष महत्त्व आहे. आधिक महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी 22 जुलै 2023 रोजी शनिवारी येत आहे. ही तिथी शुभ मानली जाते. या दिवशी काही उपाय केल्यास व्यक्तीला आर्थिक लाभ मिळू शकतो.

तुळशीचे खास उपाय

तुळशीची पाने लाल कपड्यात बांधून पैसे ठेवलेल्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने तिजोरी कधीही रिकामी राहत नाही.

पंचमी तिथीला अवश्य करावे हे काम

तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला दिवे लावा. हा उपाय केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते. यासोबतच या दिवशी धनप्राप्तीसाठी आदित्य ह्रदय स्तोत्राचा पाठ करा.

हे सुद्धा वाचा

हनुमानाला रूईच्या पानांचा हार घालावा

अधिकमासातील पंचमी तिथीला रूईच्या पानांचा हार बनवून हनुमानाला अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला हनुमानाची कृपा प्राप्त होते. यासोबतच घरातील सर्व प्रकारचे दोषही या उपायाने दूर होतात.

छायादान करा

तिळाचे तेल वाटीत किंवा एखाद्या पात्रात घेऊन त्यात स्वःताचे प्रतिबींब पाहावे, त्यानंतर ते तेल एखाद्या गरीबाला किंवा शनि मंदिरात दान करावे. या विधीला छायादान असे म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीला शारीरिक व्याधी होत असतील तर त्याच्यासाठी छाया दान करणे खूप फायदेशीर आहे. अशा व्यक्तीने छायादान दान करावे.

छाया दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते. शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात. शनिदेवाच्या दुःखापासून माणसाला मुक्ती मिळते. छाया दान माणसातील नकारात्मक विचार आणि घरातील वाईट गोष्टींना संपवते. सावली दान केल्याने व्यक्तीमध्ये जी काही नकारात्मकता असेल किंवा जे काही दुःख असेल ते सर्व तुमच्या सावलीसह परोपकारात जातात. व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि व्यक्तीला आरोग्य मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.