आयुष्यात ‘या’ गोष्टी घडू लागल्या तर वेळीच व्हा सावधान, असतात वाईट काळाचे संकेत
माणसाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दोन्ही काळ येतात. वाईट काळात माणसाला समस्यांचा सामना करावा लागतो. वाईट काळ माणसाला शिकवतो. त्याच वेळी, ज्योतिषशास्त्रात असे काही संकेत सांगितले आहेत, जे पाहिल्यावर समजू शकते की वाईट काळ सुरू होणार आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रसंग येतात. चांगल्या आणि वाईट काळामध्ये आपल्यासा कोणतरी आपल्या सोबत हवे असते. चांगले प्रसंग एखाद्या माणसाला त्यांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होते आणि आपल्या मनाला देखील चांगले वाटते. परंतु आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला जेव्हा कोणाची गरज असते त्यावेळी आपल्यासोबत कोणीच नसते. तो काळ प्रत्येकाला एकट्याने सोडवायचा असतो. तुम्हाला माहिती आहे का? काळ चांगला असो किंवा वाईट तो जास्त दिवस टिकत नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत राहातात. चांगल्या काळात माणूस सुखसोयींचा आनंद घेतो, तर वाईट काळ माणसाला जीवनाचे धडे शिकायला मिळतात.
परंतु, ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटले जाते की आपल्या आयुष्यामध्ये चांगले आणि वाईट हे दोन्ही प्रसंग महत्त्वाचे असतात. कारण चांगले प्रसंग आपल्याला मानासारख्या गोष्टी देतात आणि वाईट प्रसंग आपल्याला अधिक शक्ती देतात. ग्रंथांमध्ये सांगितले आहे की, वाईट काळ येण्यापूर्वी आपल्याला काही संकेत दिसून येतात ज्यामुळे आपल्याला कळते वाईट काळ सुरू होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये वाईट काळ सुरू होण्यापूर्वी तुम्हाला काय संकेत दिसून येतील चला जाणून घेऊयात.
जर एखाद्या व्यक्तीच्या घरात तुळशीचे रोप अचानक सुकू लागले तर त्याने समजून घ्यावे की त्याचा वाईट काळ सुरू होणार आहे. तुळशीचे रोप सुकणे हे घरातील आर्थिक संकटाचे संकेत देते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जर घरात अचानक काळ्या उंदरांची संख्या वाढली तर ते वाईट काळाचे लक्षण मानले जाते. जर अचानक एखाद्याच्या घरी खूप काळे उंदीर येऊ लागले तर त्याने समजून घ्यावे की भविष्यात त्याच्या घरी काहीतरी आपत्ती येणार आहे. ज्योतिषशास्त्रात सोन्याची वस्तू हरवणे अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जर एखाद्याने सोन्याची कोणतीही वस्तू हरवली तर त्याच्या घरात नकारात्मकता येऊ लागते. कारण सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरात सरड्यांचे भांडण शुभ नाही. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की घरात सरड्यांची लढाई वाईट काळाची सुरुवात दर्शवते. पूजा करताना अचानक प्लेट खाली पडली तर ते चांगले नाही. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की हे येणाऱ्या वाईट काळाचे लक्षण आहे. जर असे घडले तर एखाद्याने ताबडतोब देवाकडे क्षमा मागितली पाहिजे.
घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी काय करावे?
घरात अनावश्यक वस्तू, रद्दी आणि कचरा असल्यास, ते त्वरित काढून टाका. यामुळे जागा स्वच्छ आणि उघडी राहते, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. सकारात्मक विचार आणि बोलणे वाढवा. स्वतःला आणि इतरांना प्रोत्साहन द्या. सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास, नकारात्मक विचारांना कमी करता येते. पाळीव प्राणी घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात. दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा, जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकेल. घराच्या ईशान्य भागात लहान पाण्याचे घटक लावल्याने सकारात्मक ऊर्जा प्रवाह आणि आर्थिक गती वाढते.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.