Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : अशा मित्रांपासून चार हात दूरच राहा; नाहीतर येईल पश्चतापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आदर्श मित्राचे काही लक्षणं सांगितली आहेत, तसेच मित्रांचे असे देखील काही गुण सांगितले आहेत, ते गुण जर तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये दिसून आले तर त्याच्यापासून चार हात दूरच राहा असा सल्ला ते देतात.

Chanakya Neeti : अशा मित्रांपासून चार हात दूरच राहा; नाहीतर येईल पश्चतापाची वेळ, चाणक्य काय सांगतात?
Follow us
| Updated on: Mar 29, 2025 | 9:58 PM

आर्य चाणक्य हे एक महान कुटनीती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, आणि राजकीय तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. या ग्रंथामध्ये त्यांनी आदर्श आयुष्य कसं जगावं? काय करू नये, काय करावं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना हा ग्रंथ मार्गदर्शक ठरत आहे. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी आपले विचार मांडले आहेत. आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? पतीची कर्तव्य कोणती? पत्नीची कर्तव्य कोणती. राजाने कोणत्या चुका करू नये? राजाची कर्तव्य काय आहेत? कोणाला आपला मित्र म्हणावं, शत्रू कसा ओळखावा अशा एकना अनेक विषयांवर आर्य चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं आहे.

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आदर्श मित्राचे काही लक्षणं सांगितली आहेत, तसेच मित्रांचे असे देखील काही गुण सांगितले आहेत, ते गुण जर तुम्हाला तुमच्या मित्रांमध्ये दिसून आले तर त्याच्यापासून चार हात दूरच राहा असा सल्ला आर्य चाणक्य यांनी दिला आहे. मित्राने कधीच मित्राचा विश्वासघात करता कामा नये असं आर्य चाणक्य म्हणतात. मैत्री हे नात सर्वच नात्यांमध्ये श्रेष्ठ नातं असतं. त्यामुळे कोणासोबतही मित्रता करताना माणसानं सावध असावं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

अशा लोकांपासून दूर राहा 

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रथांमध्ये एक आदर्श मित्र कसा असावा याबाबत विस्तृत लिखान केलं आहे. आर्य चाणक्य म्हणतात की मैत्रीमध्ये कोणताही आडपडदा नसावा. मात्र जर तुमच्या एखाद्या मित्राने तुमचा विश्वासघात केला आहे, अशी तुमची खात्री पटली तर तुम्ही अशा मित्रापासून योग्य ते अंतर ठेवा. मित्र हा आपल्या चुका सुधारण्यासाठीच असतो, तो जर आपल्या चुका आपल्या तोंडावर सांगत असेल तर तो उत्तम मित्र असं चाणक्य म्हणतात. मात्र  तुमचा मित्र जर तुमच्या पाठिमागे इतर लोकांसमोर निंदा करत असेल तर असा मित्र असण्यापेक्षा नसलेला बरा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.