Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaitra Navratri 2025 : चैत्र नवरात्रीच्या दिवशी मुख्यद्वारा जवळ ठेवा ‘या’ वस्तू आणि घरातील आर्थिक चणचण दूर करा

Chaitra Navratri Upay : चैत्र नवरात्रीला सुरूवात होणार आहे. नवरात्रीत काही उपाय केल्याने घरात आनंद आणि शांती तर येतेच पण कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही सुधारते. या अंतर्गत, वेगवेगळ्या वनस्पतींची मुळे दाराशी बांधली जातात, ज्यांचे वेगवेगळे फायदे आहेत.

Chaitra Navratri 2025 : चैत्र नवरात्रीच्या दिवशी मुख्यद्वारा जवळ ठेवा 'या' वस्तू आणि घरातील आर्थिक चणचण दूर करा
चैत्र नवरात्री उपायImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 29, 2025 | 1:53 PM

सनातन धर्मात नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत, माता जगदंबेची पूजा विधीपूर्वक केली जाते. नवरात्रोत्सव वर्षातून चार वेळा साजरा केला जातो, ज्यामध्ये शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र आणि दोन गुप्त नवरात्रांचा समावेश असतो. या वर्षी चैत्र नवरात्र ३० मार्चपासून सुरू होत आहे. नवरात्रीच्या काळात ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्याने कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी राहते. चैत्र नवरात्रीच्या वेळी तुम्ही नियमित पणे देवीची पूजा आणि व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच घरामध्ये सकारात्मकता वाढण्यास मदत होते.

तुमच्या घरातील सदस्यांमध्ये मतभेद वाढताना दिसत असतील तर चैत्र नवरात्री दरम्याण देवीची पूजा केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यासोबतच देवीची उर्जा आणि आशिर्वाद तुमच्या घरातील सर्व सदस्यांना देवीचे आशिर्वाद मिळण्यास मदत होते. नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले जातात. यापैकी काही वनस्पतींची मुळे घराच्या दारावर बांधणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि संपत्ती वाढते.

तुळशीच्या मुळ्या – सनातन धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते. घरी तुळशीचे रोप ठेवून त्याची नियमित पूजा केल्याने शुभ फळे मिळतात. घराच्या दारावर तुळशीचे मूळ बांधल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.

हे सुद्धा वाचा

आंब्याच्या मुळ्या – धार्मिक मान्यतेनुसार, आंब्याचे झाड पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घराच्या दारावर आंब्याचे मूळ बांधल्याने घरात सुख-समृद्धी राहते आणि कुटुंबातील सदस्य आनंदी राहतात.

शमीच्या मुळ्या – धार्मिक ग्रंथांमध्ये शमीच्या मुळाचे शमी रोप अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नवरात्रीत शमी मुळाची विशेषतः पूजा केली जाते. घराच्या दारावर ते बांधल्याने मानसिक शांती मिळते आणि घरात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही.

पिंपळाच्या मुळ्या – भारतीय संस्कृतीत पिंपळाचे झाड खूप पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की भगवान विष्णू या झाडात राहतात. नवरात्रीत घराच्या दाराशी पिंपळाच्या झाडाचे मूळ बांधल्याने घरात समृद्धी येते. हे केवळ संपत्ती मिळविण्यासाठी शुभ नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.