Eid Ul Fitr 2023 : भारतात कधी साजरी होणार ईद? असे आहे महत्त्व

ईद-उल-फित्र इस्लामिक कॅलेंडरच्या 10 व्या शव्वालच्या पहिल्या तारखेला आणि रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर साजरी केली जाते.

Eid Ul Fitr 2023 : भारतात कधी साजरी होणार ईद? असे आहे महत्त्व
ईद-उल-फित्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 12:01 PM

मुंबई :  24 मार्चपासून रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. रमजान महिन्यात 29 किंवा 30 दिवस उपवास ठेवला जातो आणि त्यानंतर ईदचा सण साजरा केला जातो. याला ईद-उल-फित्र (Eid Ul Fitr 2023)असेही म्हणतात. ईद हा मुस्लिम समाजातील लोकांसाठी सर्वात मोठा आणि विशेष सण आहे. त्यामुळे प्रत्येकजण ईदची आतुरतेने वाट पाहत असतो. ज्याप्रमाणे रमजानचा महिना चंद्रदर्शनानंतर सुरू होतो, त्याचप्रमाणे रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद साजरी केली जाते.

या दिवशी साजरी करतात ईद-उल-फित्र

ईद-उल-फित्र इस्लामिक कॅलेंडरच्या 10 व्या शव्वालच्या पहिल्या तारखेला आणि रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर साजरी केली जाते. चंद्र दिसल्यानंतरच ईदची नेमकी तारीख ठरवली जाते. सर्वप्रथम सौदी अरेबियामध्ये ईदचा चंद्र दिसल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर जगभरातील मुस्लिम समुदायाचे लोक ईद साजरी करतात.

22 किंवा 23 एप्रिलला ईद कधी साजरी होणार?

पाकिस्तानमध्ये 22 एप्रिल रोजी ईद साजरी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याच वेळी, भारतातही या तारखेला ईद साजरी होण्याची दाट शक्यता आहे. पण भारतात 23 एप्रिललाही ईद साजरी केली जाऊ शकते कारण अरब देशांसह पाकिस्तानमध्ये 23 मार्चपासून रमजानचा महिना सुरू झाला आहे. त्याच वेळी, 24 मार्चपासून भारतात रमजान महिना सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत जर भारतात 22 एप्रिलला ईद साजरी झाली तर रमजानचे केवळ 29 उपवास पूर्ण होतील. त्याचबरोबर पाकिस्तान आणि अरब देशांमध्ये रमजानचे 30 दिवस पूर्ण होतील. मात्र 29 दिवस उपवास करूनही ईद साजरी करता येते.

हे सुद्धा वाचा

अशा परिस्थितीत 21 एप्रिलला चंद्र दिसल्यास 22 एप्रिलला ईद साजरी केली जाईल आणि 22 एप्रिलला 30 दिवस उपवास केल्यानंतर 23 एप्रिलला ईद साजरी केली जाईल. जर भारतातील रोजेदार 29 दिवस उपवास करतात तर ईद 22 एप्रिलला असेल आणि 30 दिवस उपवास ठेवल्यास ईद 23 एप्रिलला असेल.

22 एप्रिलला भारतात ईद होण्याची शक्यता काय आहे

इस्लामिक कॅलेंडर 29 किंवा 30 दिवसांचे असते. 2021 आणि 2022 मध्ये इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान महिना 30 दिवसांचा होता. वर्ष-दर-वर्षाचा आकडा बघितला तर, या वर्षी रमजान 30 दिवसांचा असेल, तर पुढच्या वर्षी 29 दिवसांचा असेल हे कळते. अशा परिस्थितीत, या वर्षी 2023 मध्ये रमजान 29 दिवसांचा असेल आणि भारतात 22 एप्रिल रोजी ईद साजरी केली जाण्याची दाट शक्यता आहे.

23 एप्रिल रोजी भारतात ईद होण्याची शक्यता किती आहे?

शेजारील पाकिस्तानमध्ये ईदसाठी 22 एप्रिलची तारीख निश्चित करण्यात आली आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर भारतातही 23 एप्रिलला ईद साजरी होण्याची फारशी शक्यता नाही. मात्र, अरब देशांमध्ये 21 एप्रिलला चंद्र दिसत नसेल तर 23 एप्रिलला ईद साजरी केली जाऊ शकते.

ईद-उल-फित्रचे महत्त्व

ईद-उल-फित्र किंवा ईद हा मुस्लिम समाजाचा मुख्य सण आहे. याविषयी एक समजूत आहे की, या दिवशी पैगंबर हजरत मुहम्मद यांनी बद्रच्या युद्धात विजय मिळवला होता आणि या आनंदात दरवर्षी ईद साजरी केली जाते. इ.स. 624 मध्ये पहिल्यांदा ईद-उल-फित्र साजरी करण्यात आली असे म्हणतात. आनंद, शांती, सद्भावना आणि बंधुभाव वाढवण्यासाठी ईद सणाचे महत्त्व आहे. या दिवशी लोकं नवीन कपडे घालतात, नमाज वाचतात, मिठी मारतात, गोड शेवया खातात आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.