फाल्गुन पौर्णिमा 2025 : पूर्वजांच्या शांतीसाठी ‘हे’ उपाय केल्याने तुमचे आयुष्य बदलून जाणार, घरात राहील सुख-शांती
अमावस्येप्रमाणेच हिंदु धर्मात पितरांसाठी फाल्गुन पौर्णिमा फार महत्वाची मानली जाते. कारण या दिवशी पूर्वजांच्या शांतीसाठी काही विशेष उपाय केले जातात. ज्यामुळे पूर्वज आंनदी होतात आणि आपल्याला त्यांचे आशिर्वाद मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात या उपायांबद्दल...

आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमेची तारीख खूप पवित्र मानली जाते. एका वर्षात 12 पौर्णिमा येत असतात. अशाप्रकारे प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा येत असते. फाल्गुन महिना सुरू होताच जी पौर्णिमा येते त्याला फाल्गुन पौर्णिमा असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन पौर्णिमेला स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते. याशिवाय ही पौर्णिमा पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.
हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि पितृदोषापासून मुक्तता मिळावी यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. तसेच पूर्वज आनंदी होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. पूर्वजांच्या आशीर्वादाने घरात सुख-शांती राहते. अशाप्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे पूर्वज आनंदी राहावे व तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळावे यासाठी या उपायांबद्दल जाणुन घ्या.
फाल्गुन पौर्णिमा कधी आहे?




हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 13 मार्च रोजी सकाळी 10:35 वाजता सुरू होणार आहे. ते 14 मार्च रोजी दुपारी 12:23 वाजता पौर्णिमा संपणार आहे. अशा परिस्थितीत, उदयतिथीनुसार फाल्गुन पौर्णिमा 14 मार्च रोजी साजरी केली जाईल. फाल्गुन पौर्णिमेचे व्रत 13 मार्च 2025 रोजी पाळले जाणार आहे.
हे उपाय करा
दक्षिण दिशेला चारमुखी दिवा लावणे
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला चार मुखी दिवे लावावे. यानंतर, पितृ स्तोत्राचे पठण करावे. असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पूर्वज आनंदी होऊन आशीर्वाद देतात.
अन्नदान करणे
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करावे. याशिवाय, गाय, कुत्रा किंवा कावळा यांना भाकरी खायला द्या. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते.
पूर्वजांसाठी प्रार्थना करणे
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे आणि पूर्वजांसाठी प्रार्थना करावी. असे केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते.
चंद्र देवाला अर्घ्य अर्पण करणे
पौर्णिमेच्या रात्री, कच्च्या दुधात पांढरी फुले घालून चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)