Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturti 2022: हे आहेत पुण्यातील पाच मानाचे गणपती, इतिहास आणि महत्त्व

आजपासून गणेशोत्सवाला सुरवात झालेली आहे. घरोघरी बाप्पांचे आगमन झाले असून मंडळाच्या गणपतीचीसुद्धा स्थापना होत आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला पुण्यातून सुरवात केली होती. त्या निमित्याने आज आपण पुण्याच्या पाच मनाच्या गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत.

| Updated on: Aug 31, 2022 | 11:50 AM
कसबा गणपती – कसबा गणपती हा पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. या गणपतीची मूर्ती साडे तीन फूट उंचीची असते. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. कसबा गणपतीचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून असल्याचं सांगितलं जातं. विसर्जन मिरवणुकीत कसबा गणपतीला पहिलं स्थान असतं.

कसबा गणपती – कसबा गणपती हा पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखला जातो. या गणपतीची मूर्ती साडे तीन फूट उंचीची असते. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 1893 साली सुरुवात झाली. कसबा गणपतीचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून असल्याचं सांगितलं जातं. विसर्जन मिरवणुकीत कसबा गणपतीला पहिलं स्थान असतं.

1 / 5
तांबडी जोगेश्वरी – पितळी देव्हाऱ्यात या गणपतीची स्थापना केली जाते. मानाच्या गणपतींचं आणि इतर मोठ्या गणपतीचं दरवर्षी विसर्जन करण्याची रित नाही. मात्र, या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं.

तांबडी जोगेश्वरी – पितळी देव्हाऱ्यात या गणपतीची स्थापना केली जाते. मानाच्या गणपतींचं आणि इतर मोठ्या गणपतीचं दरवर्षी विसर्जन करण्याची रित नाही. मात्र, या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं.

2 / 5
 गुरुजी तालिम गणपती – या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली असते. हा गणपती एका तालमीत बसवण्यात आला होता. आता ती तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी या गपणतीच्या उत्सवाला सुरुवात झाली होती. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

गुरुजी तालिम गणपती – या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली असते. हा गणपती एका तालमीत बसवण्यात आला होता. आता ती तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात करण्यापूर्वी या गपणतीच्या उत्सवाला सुरुवात झाली होती. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो.

3 / 5
तुळशीबाग गणपती – हा गणपती उचंच उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. दक्षित तुळशीवाले यांनी 1900 मध्ये या गणेशोत्सवाची सुरुवात केली. तुळशीबाग गणपतीची मूर्ती फायबरची असते.

तुळशीबाग गणपती – हा गणपती उचंच उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. दक्षित तुळशीवाले यांनी 1900 मध्ये या गणेशोत्सवाची सुरुवात केली. तुळशीबाग गणपतीची मूर्ती फायबरची असते.

4 / 5
 केसरी वाडा गणपती – पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणून केसरीवाडा गणपतीची ओळख आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरी या संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरु झाला. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. मानाच्या पहिल्या चार गणपतीची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरुन जाते. मात्र, केसरी वाड्याच्या गणपतीची मिरवणूक केळकर रस्त्यावरुन जाते.

केसरी वाडा गणपती – पुण्यातील पाचवा मानाचा गणपती म्हणून केसरीवाडा गणपतीची ओळख आहे. लोकमान्य टिळकांच्या केसरी या संस्थेचा हा गणेशोत्सव 1894 पासून सुरु झाला. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. मानाच्या पहिल्या चार गणपतीची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरुन जाते. मात्र, केसरी वाड्याच्या गणपतीची मिरवणूक केळकर रस्त्यावरुन जाते.

5 / 5
Follow us
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.