AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gayatri Mantra : संध्याकाळी का करू नये गायत्री मंत्राचा जप, असे आहेत संध्या पूजनाचे नियम

शास्त्रात उपासनेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. याची काळजी घेतली तरच पूजेचे पूर्ण फळ मिळू शकते. हे नियम लक्षात ठेवले नाहीत तर पूजेचे फळ मिळत नाही.

Gayatri Mantra : संध्याकाळी का करू नये गायत्री मंत्राचा जप, असे आहेत संध्या पूजनाचे नियम
गायत्री मंत्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 10:14 PM

मुंबई : हिंदू धर्मात उपासनेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पूजा केल्याने मनाला शांती मिळते आणि देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्योतिष शास्त्रानुसार (Astro Tips) घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी आरती केल्याने सकारात्मकता येते. शास्त्रात उपासनेबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. याची काळजी घेतली तरच पूजेचे पूर्ण फळ मिळू शकते. हे नियम लक्षात ठेवले नाहीत तर पूजेचे फळ मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार जशी सकाळी पूजा करणे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे संध्याकाळच्या पूजेचेही खूप महत्त्व आहे. पण संध्याकाळच्या पूजेबाबतही काही नियम सांगण्यात आले आहेत. जाणून घ्या पूजेचे काही महत्त्वाचे नियम.

संध्याकाळी पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजेच्या वेळी देवाला नैवेद्य दाखवावा. यासोबतच दिवा लावावा. आरतीच्या वेळीही बेलचा वापर करावा.
  • शास्त्रानुसार संध्याकाळी तुळशीची पाने तोडू नयेत. नैवेद्यात तुळशीची पाने आवश्यक असल्यास ती अगोदरच तोडून ठेवावीत. नैवेद्य दाखवण्यापूर्वी दिवा लावावा.
  • शास्त्रानुसार गायत्री मंत्राचा जप संध्याकाळी केला जात नाही, त्यामुळे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी गायत्री मंत्राचा उच्चार न करण्याची विशेष काळजी घ्यावी.
  • गायत्री मंत्राचा जप नेहमी सूर्योदयाच्या दोन तास आधी आणि सूर्यास्तानंतर एक तास करावा. अन्यथा त्याचे पूर्ण परिणाम साध्य होत नाहीत.
  • ज्योतिषशास्त्रानुसार गायत्री मंत्राचा जप मौन राहूनही करता येतो. पण रात्री ते करणे टाळा. आंघोळीनंतर पिवळे कपडे परिधान करून गायत्री मंत्राचा जप केल्याने फायदा होतो.
  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजेनंतर दिवा विझला तर तो पुन्हा लावू नये. दिवा विझल्यानंतर फुलांची माळ परमेश्वरासमोरून काढावी.
  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजेमध्ये नेहमी दोन दिवे लावावेत. एक तूप आणि एक तेल. असे करणे शुभ मानले जाते. यावर देवाचा आशीर्वाद राहतो असे म्हणतात.
  • शास्त्रानुसार संध्याकाळच्या पूजा आणि आरतीनंतर मंदिराचे दरवाजे बंद करावेत. त्यानंतर सकाळच्या पूजेच्या वेळीच मंदिराचे दरवाजे उघडावेत.
  • ज्योतिष शास्त्रानुसार वर सांगितलेल्या नियमांचे पालन केल्यानेच उपासनेचे पूर्ण फल प्राप्त होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.