Guru Purnima 2023 : या तारखेला साजरी होणार गुरू पौर्णिमा, गुरूचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी अवश्य करा हे कामं

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः गुरूशिवाय ज्ञान नाही, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. गुरूशिवाय माणूस अज्ञानी राहतो. गुरु शिष्याच्या जीवनातील अंधार दूर करतात. ज्ञान मिळवण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूंची सेवा आणि उपासना केली पाहिजे.

Guru Purnima 2023 : या तारखेला साजरी होणार गुरू पौर्णिमा, गुरूचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी अवश्य करा हे कामं
गुरू पौर्णिमाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 3:55 PM

मुंबई : पौर्णिमा तिथी दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येते. अशा प्रकारे 3 जुलै ही आषाढ पौर्णिमा आहे. याला गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023) असेही म्हणतात. या दिवशी वेदांचे लेखक महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला. म्हणून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी पूजेबरोबरच गुरूंचीही सेवा केली जाते. गुरूशिवाय ज्ञान नाही, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. गुरूशिवाय माणूस अज्ञानी राहतो. गुरु शिष्याच्या जीवनातील अंधार दूर करतात. ज्ञान मिळवण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूंची सेवा आणि उपासना केली पाहिजे. गुरूंच्या आशीर्वादाने व्यक्ती जीवनात उच्च स्थान प्राप्त करते. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची भक्तिभावाने पूजा व सेवा करावी. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेची शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व.

गुरु पौर्णिमा 2023 तारीख

पंचांगानुसार, यावर्षी आषाढ महिन्याची पौर्णिमा 2 जुलै 2023 रोजी रात्री 8.21 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 3 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5.08 वाजता समाप्त होईल. उदय तिथी वैध असल्याने, या वर्षी गुरुपौर्णिमा सोमवार, 3 जुलै 2023 रोजी साजरी केली जाईल.ॉ

पूजा पद्धत

हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या तिथीला ब्रह्मबेलामध्ये उठल्यानंतर सर्वप्रथम भगवान विष्णू आणि वेदांचे निर्माते वेद व्यास यांना नमस्कार करावा. दैनंदिन विधी आटोपल्यावर गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे. आतां नवे वस्त्र परिधान करून आचमन करा. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यावेळी खालील मंत्राचा जप करा

हे सुद्धा वाचा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः

गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्रीगुरवे नमः

यानंतर भगवान विष्णू आणि वेद व्यास यांची फळे, फुले, धूप, दीप, अक्षत, हळद, दुर्वा इत्यादींनी पूजा करावी. गुरु चालिसा आणि गुरु कवच पठण करा. शेवटी प्रार्थना करून सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान, सुख, समृद्धी, कीर्ती मिळावी मागावी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्ञान शोधणार्‍या व्यक्तीने देवी सरस्वती आणि त्यांच्या गुरूंची पूजा करावी. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गुरूंची सेवा करावी. यासोबत आपल्या कुवतीनुसार दान आणि भेटवस्तू देऊन आपल्या गुरूंचे आशीर्वाद मिळवावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.