जर तुम्हालाही असतील या 5 सवई तर वेळीच व्हा सावध; कुबेरालाही बनवतात रंक
धन -सपत्ती प्रत्येकवेळी एकाच व्यक्तीजवळ राहाते असं काही नाही, तुमच्या सवई आणि ग्रहांची दशा यामुळे तुमच्याकडे असलेल्या संपत्तीची स्थिती बदलत राहाते.

धन -सपत्ती प्रत्येकवेळी एकाच व्यक्तीजवळ राहाते असं काही नाही, तुमच्या सवई आणि ग्रहांची दशा यामुळे तुमच्याकडे असलेल्या संपत्तीची स्थिती बदलत राहाते. जर तुम्हाला काही वाईट सवई असतील आणि तुमची ग्रहदशा देखील खराब असेल तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. मात्र जर तुमच्या सवई चांगल्या असतील आणि तुमची ग्रहस्थिती देखील मजबूत असेल तर तुमची भरभराट होईल.
मात्र काहीजण त्यांच्या दैनंदिन जीवनात अशा काही चुका करतात त्याचा मोठा फटका त्यांना बसतो. अशा सवईमुळे माता लक्ष्मी नाराज होते.मोठ्याप्रमाणात धनहानी होते, घरात गरिबी येते. आजारपण आणि इतर देखील काही समस्या निर्माण होतात. तुम्हाला जर या सवई माहिती असतील तर तुम्ही त्यामध्ये सुधारणा करू शकता. घरातील समस्या आपोआप कमी होऊन पुन्हा एकदा तुमच्या घराची भरभराट होईल, तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावेल. जाणून घेऊयात या सवईंबद्दल
अनेकजण अंघोळीच्या वेळी आपला एक पाय दुसऱ्या पायावर घासण्याची चूक करतात, यामुळे तुमच्या जन्म कुंडलीमध्ये असलेला शनि नाराज होतो. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.घरात गरीबी येते.
जे लोक जोराने बोलतात जे लोक मोठ्यानं बोलतात, बोलताना चिडचिड करतात त्यांचा राहू खराब असतो. राहु खराब असल्यास आयुष्यात अचानक अनेक अडचणी येतात. अपघात देखील घडू शकतो. अचानक मोठ्याप्रमाणात धन हानी होते.
काहीही न करता दुसऱ्याची निंदा करणे – जर तुम्हालाही ही सवय असेल तर वेळीच सावध व्हा, या सवयीमुळे इतरांवर तुमचा वाईट प्रभाव पडतो. तसेच प्रगतीला खिळ बसते. शरीराच्या काही भागांमध्ये वेदना जाणवतात.
जेवल्यानंतर तुम्ही जर त्याच ताटामध्ये हात धूत असाल तर ही सवय आजच बदला, कारण असं केल्यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होते. यामुळे मोठ्या प्रमाणात संपत्तीचं नुकसान होतं.
चालताना तुम्ही जर तुमच्या पायाचा जास्त आवाज करत असाल तर ते देखील शुभ लक्षण मानलं जातं. यामुळे माता लक्ष्मी नारज होते. घरात गरीबी येते, त्यामुळे तुम्ही तुमची ही सवय आजच बदला.