Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात अवश्य करा तुळशीचे हे उपाय, मिळेल पिंडदानाचे पुण्य

सनातन धर्मात असे मानले जाते की पितृपक्षाचा काळ पितरांना समर्पित आहे. या काळात पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो. या काळात केलेल्या काही उपायांमुळे पितृदोष दूर होतो.

Pitru Paksha 2023 : पितृपक्षात अवश्य करा तुळशीचे हे उपाय, मिळेल पिंडदानाचे पुण्य
पितृपक्षImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 8:47 AM

मुंबई : पितृपक्षाला (Pitru Paksha 2023) कालपासून म्हणजेच 29 सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. 14 ऑक्टोबरला पितृपक्ष संपेल. सनातन धर्मात असे मानले जाते की हा काळ पितरांना समर्पित आहे. या काळात पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो. या काळात केलेल्या काही उपायांमुळे पितृदोष दूर होतो. पितरांची नाराजी असल्यास प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते. पितृपक्षातील काही उपाय तुळशीशी संबंधीत देखील आहेत. याशिवाय हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. अशा स्थितीत पितृपक्षात तुळशीशी संबंधित काही उपाय केल्यास व्यक्तीला अनेक फायदे होतात.

पितृपक्षात तुळशीशी संबंधीत हा उपाय अवश्य करा

पितृपक्षात तुळशीच्या भांड्याजवळ एक वाटी ठेवावी. यानंतर तळहातात गंगाजल घ्या आणि हळूहळू भांड्यात टाका. या दरम्यान, आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांची नावे 5 ते 7 वेळा घ्या. शेवटी हे पाणी संपूर्ण घरात शिंपडा. उरलेले पाणी तुळशीत टाका.

गंगाजल शिंपडल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. पण लक्षात ठेवा की रविवारी आणि एकादशीला हा उपाय करू नये, कारण या दिवशी तुळशीला पाणी दिले जात नाही. पितृ पक्षाच्या काळात केलेला हा उपाय खूप उपयुक्त ठरू शकतो.

हे सुद्धा वाचा

असे पोहचते पितरांपर्यंत श्राद्धचे भोजन

पितरांना अर्पण केलेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोहोचते हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. याचे उत्तर गरुड पुराणात आहे. गरुड पुराणानुसार, विश्वदेव आणि अग्निश्रव नावाचे दोन दैवी पूर्वज आहेत. ही दोन्ही दैवी पूर्वज नावे गोत्राच्या साहाय्याने अर्पण केलेल्या वस्तू पितरांपर्यंत पोहोचवतात. आपले पूर्वज जर देव योनीत असतील तर श्राद्धाचे अन्न अमृताच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचते. मनुष्य योनीत असेल तर त्याला अन्नाच्या रूपात, प्राण्यांच्या योनीत गवताच्या रूपात, सापाच्या योनीत वायूच्या रूपात आणि यक्ष योनीत पान स्वरूपात अन्न मिळते.

पितृ पक्षात हे उपाय करा

पितृ पक्षाच्या काळात तुमच्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे. असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या रूपांमध्ये भेटायला येतात. पितृपक्षात ताटात भोजन केले आणि ब्राह्मणांना ताटात भोजन अर्पण केले तर ते फलदायी ठरते.

श्राद्ध करणाऱ्या सदस्याने या दिवसांत केस व नखे कापू नयेत. त्यांनीही ब्रह्मचर्य पाळावे. श्राद्ध विधी नेहमी दिवसा करा. सूर्यास्तानंतर श्राद्ध करणे अशुभ मानले जाते. या दिवसात काकडी, हरभरा, जिरे आणि मोहरी या भाज्या खाऊ नयेत. प्राणी किंवा पक्ष्यांना त्रास देऊ नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
'ते डबडं कुठं पुरून ठेवलंय...', औरंगजेब कबरीवरून जरांगेंची CM वर टीका
'ते डबडं कुठं पुरून ठेवलंय...', औरंगजेब कबरीवरून जरांगेंची CM वर टीका.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.