Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitrudosh Upay : पितृदोषातून मुक्ती मिळविण्यासाठी आज करा हे सोपे उपाय, काय असतो पितृदोष

चैत्र अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवणे फार महत्वाचे आहे. परंतु, सूर्यग्रहण आणि सुतक यामुळे सूर्यग्रहणाचा अमावस्येवर परिणाम होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Pitrudosh Upay : पितृदोषातून मुक्ती मिळविण्यासाठी आज करा हे सोपे उपाय, काय असतो पितृदोष
पितृदोषImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 3:22 PM

मुंबई : चैत्र अमावस्या (Chaitra Amavashya 2023) 20 एप्रिल म्हणजेच आज आहे. 2023 सालचे पहिले सूर्यग्रहणही याच दिवशी होणार आहे. अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित आहे. चैत्र अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवणे फार महत्वाचे आहे. परंतु, सूर्यग्रहण आणि सुतक यामुळे सूर्यग्रहणाचा अमावस्येवर परिणाम होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वात महत्त्वचे म्हणजे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. अशा स्थितीत येथे सुतक काळही वैध ठरणार नाही. या दिवशी पितरांच्या नावाने दान करणे फार फलदायी ठरेल. यासोबतच पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही उपाय (Pitrudosh Upay) देखील करू शकता.

वैशाख अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी उपाय

अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून हातात दर्भ घेऊन पाण्याने तर्पण अर्पण करून पितरांना तृप्त करावे. पितरांचे आत्मा पाण्याने तृप्त होतात असे मानले जाते.

वैशाख अमावस्येच्या दिवशी पितरांची देवता आर्यमाची पूजा विधीपूर्वक करावी. तो पितरांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्यांची पूजा केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते.

हे सुद्धा वाचा

पितरांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी त्यांच्या आवडीचे अन्न तयार करा आणि नंतर ते कावळे, गाय, कुत्रा किंवा इतर पक्ष्यांना द्या. त्यांच्याद्वारे पितरांना अन्न मिळते असे म्हणतात.

अमावस्या तिथीला भगवान विष्णूची पूजा करावी. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने व्यक्तीला विशेष फल प्राप्त होते. यासोबतच या दिवशी पवित्र नदीत स्नान करावे. आंघोळ वगैरे करता येत नसेल तर घरी गंगेचे पाणी मिसळून स्नान करू शकता.

जर कोणाला काल सर्प दोष असेल तर ते टाळण्यासाठी अमावस्येच्या दिवशी चांदीच्या नागाच्या जोडीची पूजा करून वाहत्या पाण्यात वाहून जाऊ द्या. असे केल्याने तुम्हाला काल सर्प दोषापासून मुक्ती मिळेल.

पितृदोष म्हणजे काय?

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर विधीनुसार अंतिम संस्कार केले नाहीत किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. हे केवळ एका पिढीपुरतेच नाही तर पिढ्यानपिढ्या चालू असते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.