Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेनंतर रामललाची मूर्ती झाली सजीव? प्रेमानंद महाराजांनी सांगितले रहस्य

22 जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला, त्यानंतर सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा एक फोटो व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका भक्ताने विचारले की, प्राणप्रतिष्ठेमध्ये स्थापित केलेली मूर्ती दिव्य आणि जिवंत झाली, या जिवंतपणाचे कारण काय? प्रेमानंद महाराजांनी यावर काय उत्तर दिले ते जाणून घेऊया.

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेनंतर रामललाची मूर्ती झाली सजीव? प्रेमानंद महाराजांनी सांगितले रहस्य
रामललाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 9:50 AM

अयोध्या : प्रेमानंद महाराज (Premanand Maharaj) हे एक कथाकार आहेत ज्यांचे जगभरात मोठ्या संख्येने भक्त आहेत. प्रेमानंद जी सध्या वृंदावनात राहतात आणि त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. शास्त्रात आणि पुराणात असलेलं ज्ञान महाराज सोप्या शब्दात सांगतात. महाराजांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या सोशल मीडियावर महाराजांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका भक्ताने खूप छान प्रश्न विचारला आहे आणि महाराजांनीही खूप सुंदर उत्तर दिले आहे.

रामललाची मूर्तीवर जिवंत भाव कसे आलेत? असा प्रश्न एका भाविकाे विचारला होता

22 जानेवारीला राम मंदिरात रामललाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला, त्यानंतर सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांचा एक फोटो व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका भक्ताने विचारले की, प्राणप्रतिष्ठेमध्ये स्थापित केलेली मूर्ती दिव्य आणि जिवंत झाली, या जिवंतपणाचे कारण काय? प्रेमानंद महाराजांनी यावर काय उत्तर दिले ते जाणून घेऊया.

प्रेमानंद महाराजांनी सांगितले की जिवंतपणामागे महापुरुषांचे मंत्र आणि भक्तांच्या भावना आहेत. दोघांमध्येही खूप ताकद आहे. केवळ एक-दोन भक्तांच्याच नाही तर असंख्य भाविकांच्या भावना रामजींच्या मूर्तीशी निगडित आहेत. दशरथनंदन आधीच तिथे होते पण मंत्रोच्चाराे  अभिषेक केल्यावर रामललाच्या मूर्तीत तेज आले, यात नवल नाही.

हे सुद्धा वाचा

नरसिंहजी प्रकट झाले होते

उदाहरण देताना, प्रेमानंद महाराज म्हणाले की त्यांनी मंत्राचा जपही केला नाही, परंतु लाखो भक्तांच्या भावनेने स्मरण केले तेव्हा नरसिंहजी स्तंभावरही प्रकट झाले. मंत्रांनी चमत्कार घडले आहेत, प्राणप्रतिष्ठेच्या आधी आणि नंतरच्या दर्शनात खूप फरक आहे. देवाचा प्रत्यक्ष वास्तव्य मूर्तीत आहे आणि असे अनुभव नेहमीच येत राहतील.

प्रेमानंद महाराज कोण आहेत?

प्रेमानंद महाराज जी उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि सध्या वृंदावन येथे राहत आहेत. त्यांनी अगदी लहान वयातच संन्यास घेतला. महाराज सत्संगातून अनेकांना मार्गदर्शन करतात. सत्संगाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात जे लोकांना खूप आवडतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.