Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

का केली जात नाही ब्रह्मदेवाची पुजा? पृथ्वीवर ब्रह्मदेवाचे केवळ एकमेव मंदिर

पुराणानुसार, एकदा ब्रह्माजी हातात कमळाचे फूल घेऊन आपल्या वाहन हंसावर स्वार होऊन अग्नि यज्ञासाठी योग्य जागा शोधत होते...

का केली जात नाही ब्रह्मदेवाची पुजा? पृथ्वीवर ब्रह्मदेवाचे केवळ एकमेव मंदिर
ब्रह्मादेव Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 2:58 PM

मुंबई : हिंदू ग्रंथ आणि पुराणानुसार ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे विश्वाचे निर्माता, पालनकर्ता आणि संहारक मानले जातात पण तुमच्या मनात हा प्रश्न अनेकवेळा आला असेल की जगभरात विष्णू आणि महेश म्हणजेच महादेवाची अनेक मंदिरे आहेत आणि याशिवाय आपण त्यांची घरीसुद्धा स्थापना करून पूजा करतो पण ब्रह्मदेवाची (Brahma temple) कधीच पूजा केली जात नाही. आणि त्याचे एकच मंदिर आहे, जे पुष्करमध्ये आहे. ब्रह्मदेवाची पूजा करणे निषिद्ध का मानले जाते? यामागे नेमके काय कारण आहे ते जाणून घेऊया.

ब्रह्मदेवाला देण्यात आला होता शाप

पुराणानुसार, एकदा ब्रह्माजी हातात कमळाचे फूल घेऊन आपल्या वाहन हंसावर स्वार होऊन अग्नि यज्ञासाठी योग्य जागा शोधत होते.

तेवढ्यात एके ठिकाणी त्याच्या हातातून कमळाचे फूल पडले. हे फूल पृथ्वीवर पडताच पृथ्वीवर एक झरा तयार झाला आणि त्या झर्‍यापासून 3 सरोवर तयार झाली.

हे सुद्धा वाचा

ज्या ठिकाणी ते तीन धबधबे तयार झाले ते ब्रह्मा पुष्कर, विष्णू पुष्कर आणि शिव पुष्कर म्हणून ओळखले जातात. हे पाहून ब्रह्माजींनी या ठिकाणी यज्ञ करण्याचे ठरवले.

यज्ञात ब्रह्माजींना त्यांची पत्नी सोबत असणे आवश्यक होते. भगवान ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री तिथे नव्हती आणि शुभ वेळ निघून जात होती.

या कारणास्तव ब्रह्माजींनी त्याच वेळी तेथे उपस्थित असलेल्या एका सुंदर स्त्रीशी विवाह केला आणि तिच्याबरोबर यज्ञ केला.

देवी सावित्रीला याची माहिती मिळाली. यामुळे संतप्त होऊन त्यांनी ब्रह्माजींना शाप दिला की ज्याने विश्व निर्माण केले त्याची संपूर्ण विश्वात कुठेही पूजा केली जाणार नाही.

पुष्कर वगळता जगात कुठेही ब्रह्मदेवाचे मंदिर नसेल. या शापामुळे ब्रह्माजींचे एकमेव मंदिर पुष्करमध्ये आहे. पद्मपुराणानुसार ब्रह्माजी पुष्करच्या या ठिकाणी दहा हजार वर्षे वास्तव्यास होते. या दरम्यान त्याने विश्वाची निर्मिती केली.

यानंतर त्यांनी पाच दिवस यज्ञ केला. याच यज्ञात सावित्री पोहोचली होती. आजही भक्त दूरवरूनच ब्रह्माजींचे दर्शन घेतात. पुराणानुसार राग शांत झाल्यावर सावित्री पुष्करजवळच्या डोंगरावर तपश्चर्या करण्यासाठी गेली. मान्यतेनुसार सावित्री देवी मंदिरात राहून भक्तांचे कल्याण करते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात
उन्हाळ्यात ट्रेकला जाताय तर थांबा, भर उन्हात ट्रेक करणं पडलं महागात.
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना
जन्मदात्या आईनंच पोटच्या पोराला संपवलं, नांदेडमध्ये खळबळजक घटना.
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन
अमरावतीत मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन.
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार
लातूर मनपा आयुक्त मनोहरेंना एअर अ‍ॅम्ब्यूलन्सने मुंबईत आणणार.
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?
'पेशंटवर साडेपाच तास उपचारच नाही', चाकणकरांकडून मोठी अपडेट काय?.
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं
गर्भवतीच्या मृत्यूस रुग्णालयच दोषी; रूपाली चाकणकरांनी स्पष्टच सांगितलं.