Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL prize money : हरल्यानंतरही RCBला 7 कोटी, जाणून घ्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सला किती रक्कम मिळणार?

पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातील.

IPL prize money : हरल्यानंतरही RCBला 7 कोटी, जाणून घ्या गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सला किती रक्कम मिळणार?
हरल्यानंतरही RCBला 7 कोटीImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 9:14 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) दुसऱ्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) राजस्थान रॉयल्सकडून (RR) 7 गडी राखून पराभव झाला. यामुळे पुन्हा एकदा आरसीबीचे खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांच्या विजेतेपदाचे स्वप्न भंगलंय. मात्र, पराभव होऊनही या संघावर कोट्यवधींचा पाऊस पडला आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीने गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल हंगामासाठी आरसीबीला 7 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सच्या खात्यात 6.50 कोटी रुपये जमा होतील. हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने यंदाच्या आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. विजेत्या संघाला 20 कोटी रुपये तर पराभूत संघाला 13 कोटी रुपये मिळतील.

पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्यांना काय?

याशिवाय पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातील. दुसरीकडे, उदयोन्मुख खेळाडूला 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. त्याच वेळी लीग टप्प्यात बाहेर पडलेल्या संघांना किती रक्कम मिळेल याबद्दल कोणतीही माहिती नाही.

आयपीएल 2022 बक्षीस रक्कम

  1. विजेता – 20 कोटी
  2. उपविजेते – 13 कोटी
  3. हे सुद्धा वाचा
  4. तिसरे स्थान – 7 कोटी
  5. चौथे स्थान – 6.5 कोटी

विजेत्या संघाला 2008 मध्ये 4.8 कोटी रुपये मिळाले

आयपीएलचा पहिला सीझन 2008 मध्ये खेळला गेला त्यादरम्यान शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले. त्यावेळी आरआरला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. ही लीग जसजशी जगभर लोकप्रिय होत गेली तसतशी बक्षिसांची रक्कमही वाढत गेली. आजघडीला जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस मिळते.

दो दोस्तो की टक्कर, याद रखेगा जमाना!

पंधरा वर्षापूर्वी आयपीएलच्या पहिल्या सीजनचे विजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला पुन्हा एकदा इतिहास घडवण्याची संधी आहे. तर दुसरीकडे दिग्गज संघांचा पराभव करून आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला आयपीएलला नवा चॅम्पियन देण्याची संधी आहे. आज दोन शेजारील राज्यांचे संघ इतिहास घडवण्यासाठी मैदानात उतरतील. राजस्थान एकदा चॅम्पियन राहिलाय. मात्र, याला अनेक वर्ष झाले आहेत. तर गुजरात मात्र नवा संघ आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे. तर

कुठे होणार अंतिम सामना?

आयपीएलचा सामना पाहण्यासाठी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाखाहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा सामना पाहण्यासाठी एक लाख 10 हजाराहून अधिक प्रेक्षक पोहोचले तर हा एक विश्वविक्रम ठरेल. आयपीएलचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आसल्यानं हे देखील त्यातल्या त्यात विशेष आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.