Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भेटलास तर लय बेक्कार चोपेन’; शोएब अख्तरची सेहवागला धमकी

भारत आणि पाकिस्तान (Ind and Pak) यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सीमेवरील तणावामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून झालेली नाही. दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धेतच एकमेकांविरोधात खेळतात.

'भेटलास तर लय बेक्कार चोपेन'; शोएब अख्तरची सेहवागला धमकी
Shoaib Akhtar, Virender Sehwag
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 11:53 AM

मुंबई : भारत आणि पाकिस्तान (Ind and Pak) यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सीमेवरील तणावामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून झालेली नाही. दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धेतच एकमेकांविरोधात खेळतात. जेव्हा-जेव्हा दोन्ही संघांमध्ये सामने झाले आहेत, तेव्हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हे एक मोठे आकर्षण ठरले आहे. टीम इंडिया कडून वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दोघेही मैदानाबाहेर चांगले मित्र असले तरी. यावेळी सोशल मीडियावर दोन दिग्गजांमध्ये युद्ध रंगले आहे. हे युद्ध मैत्रीपूर्ण आणि मजेदार आहे. सेहवागच्या एका कमेंटवर अख्तर म्हणाला की, “ज्या दिवशी सेहवाग मला भेटेल तेव्हा मी त्याला खूप मारेन.”

सेहवागची ट्विटरवर मजेशीर कमेंट

नुकताच शोएब अख्तरने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने सूट परिधान केलेला दिसत होता. अख्तरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा एक नवीन लूक आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.” यावर सेहवागने कमेंट केली होती, “ऑर्डर लिहून घे, एक बटर चिकन, दोन नान आणि एक बिअर.”

अख्तरचं यूट्यूब चॅनलवर उत्तर

शोएब अख्तरला अलीकडेच एका यूट्यूब चॅट शोमध्ये सेहवागच्या या कमेंटबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न येताच शोएब अख्तर हसायला लागला आणि त्याला काय बोलावे तेच समजेना. यावर तो म्हणाला की, “ज्या दिवशी मला सेहवाग भेटेल तेव्हा मी त्याला खूप मारेन.” अख्तर हे सगळं हसत आणि गमतीने म्हणत होता.

दोन्ही संघांमध्ये 10 वर्षांपासून एकही मालिका झाली नाही

टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये 10 वर्षांपासून एकही द्विपक्षीय मालिका खेळवली गेली नाही. उभय संघांमधील शेवटची मालिका डिसेंबर 2012 मध्ये खेळवण्यात आली होती. तेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारतात दोन्ही संघांमधील 2 टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. तसेच पाकिस्तानने 3 वनडे सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती.

इतर बातम्या

Women’s World Cup 2022: पूजा वस्त्राकरचा 81 मीटरचा षटकार, ठरला वर्ल्डकपमधला सर्वात लांब सिक्सर

IND vs AUS, Women’s World Cup 2022: सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग, भारताला धूळ चारत ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करुन टीम इंडियात स्थान मिळवणार; स्पर्धेआधी शिखर धवनचा निर्धार

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.