Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s World Cup 2022: बांगलादेशच्या पोरींचं वादळ, पाकिस्तान नेस्तनाबूत, 5 धावांत 5 विकेट्स घेत विजयी सलामी

आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत बांगलादेशविरुद्धही (Bangladesh) पाकिस्तानला (Pakistan) विजय मिळवणे शक्य झाले नाही. बांगलादेशी महिलांनी पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले.

Women’s World Cup 2022: बांगलादेशच्या पोरींचं वादळ, पाकिस्तान नेस्तनाबूत, 5 धावांत 5 विकेट्स घेत विजयी सलामी
Bangladesh Women’s Team (PAK W vs BAN W) Image Credit source: ICC
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 11:28 AM

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup 2022) स्पर्धेत बांगलादेशविरुद्धही (Bangladesh) पाकिस्तानला (Pakistan) विजय मिळवणे शक्य झाले नाही. बांगलादेशी महिलांनी पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले. बांगलादेशच्या महिला संघाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानवर पहिला विजय नोंदवला. दुसरीकडे, पाकिस्तानला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांची सर्वात मोठी धावसंख्या उभारली, जी पाहून पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाठी आल्यावर पहिल्या चेंडूपासून दबावात होती. परिणामी पाकिस्तानला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.

बांगलादेशने पाकिस्तानचा 9 धावांनी पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 234 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला 50 षटकांत 9 फलंदाजांच्या बदल्यात केवळ 225 धावा करता आल्या. 234 धावांपूर्वी, बांगलादेशची सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या 211 धावा इतकी होती, जी त्यांनी 2019 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना केली होती.

5 धावांत 5 बळी घेत बांगलादेशची पाकिस्तानवर मात

बांगलादेशच्या वनडेतील सर्वात मोठ्या धावसंख्येसमोर पाकिस्तानने आपल्या डावाची चांगली सुरुवात केली होती. या स्पर्धेत पहिल्यांदाच त्यांच्या सलामीच्या जोडीमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. 42 व्या षटकात 183 धावा झाल्या. म्हणजेच विजय आता 52 धावा दूर होता, त्या करण्यासाठी 7 विकेट्स आणि 8 षटके शिल्लक होती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे खेळपट्टीवर सेट झालेली फलंदाज सिद्रा अमीन क्रीझवर होती. त्यामुळे हा सामना पाकिस्तानचा संघ सहज जिंकेल असे सर्वांना वाटत होते.

पण इतकं सगळं पाकिस्तानच्या बाजूने असूनही पुढच्या 13 चेंडूंमध्ये असं काही घडतं, ज्यामुळे सामन्याचं दृश्यच बदलून जातं. पाकिस्तानची मधली फळी अचानक कोलमडली. 183 धावांवर तिसरी विकेट पडल्यानंतर 188 धावांपर्यंत पाकिस्तानच्या 7 विकेट्स गेल्या होत्या. म्हणजेच 13 चेंडूत केवळ 5 धावांवर 5 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. मधली फळी उद्ध्वस्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या हातून सामना निसटला. बांगलादेशने त्यांच्या आणखी दोन विकेट्स घेतल्या आणि त्यांच्या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

इतर बातम्या

ICC WWC 2022: पुरुषांनाही लाजवतील असे दोन झेल आणि रनआऊट, ‘या’ महिला क्रिकेटपटूंनी अचाट कामगिरी, पहा VIDEO

ICC WWC 2022: न्यूझीलंडला मोठ्या फरकाने हरवून ऑस्ट्रेलियाची विजयी हॅट्ट्रिक

IND W vs WI W: मिताली राज, स्मृती मानधना जबाबदारी कधी घेणार? कोच रमेश पोवार म्हणाले…

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.