IND vs BAN: तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात अमरावतीच्या खेळाडूला संधी मिळणार?

India vs Bangladesh 3rd T20i: सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध सलग 2 सामने जिंकून मालिका विजय मिळवला आहे. तर आता तिसऱ्या सामन्यात अमरावतीच्या खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

IND vs BAN: तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात अमरावतीच्या खेळाडूला संधी मिळणार?
sanju surya team indiaImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 5:49 PM

टीम इंडियाने बांगलादेशला रोहित शर्मा याच्या नेतृत्वात कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने व्हाईट वॉश दिला. त्यानंतर टीम इंडिया 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. आता सूर्यकुमार यादव याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाकडे बांगलादेशला 3-0 ने क्लिन स्वीप करण्याची संधी आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यातून नितीश कुमार रेड्डी आणि मयंक यादव या दोघांनी पदार्पण केलं. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात कोणताही बदल केला नाही. टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यासह मालिका जिंकली आहे. त्यामुळे टीम इंडिया अंतिम सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

संजू सॅमसनला डच्चू?

कॅप्टन सूर्यकुमार यादव संजू सॅमसन याला तिसऱ्या सामन्यातून डच्चू देऊ शकतो. संजू सॅमसनला इतर वेळेस संधी मिळत नसल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जातं. मात्र आता संजूला 2 सामन्यात संधी मिळाली तर त्याला छाप सोडता आली नाही. संजूला या संधीचं सोनं करुन दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20I मालिकेसाठी दावा मजबूत करता आला नाही. त्यामुळे संजूच्या जागी अमरावतीच्या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कुणाला संधी?

संजूला पहिल्या 2 सामन्यात बॅटिंगने काही खास करता आलं नाही. संजूने दोन्ही सामन्यात एकूण 39 धावा केल्या. संजूला पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्याला त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. त्यामुळे आता संजूच्या जागी तिसऱ्या सामन्यात अमरावतीच्या जितेश शर्मा याचा समावेश केला जाऊ शकतो. आता कॅप्टन सूर्यकुमार संजूवर विश्वास दाखवत त्याला तिसऱ्या सामन्यातही खेळवणार की जितेशला संधी देणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.

बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.