Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: अनुभवी ऑलराउंडर निवृत्तीसाठी सज्ज, शनिवारी खेळणार अखेरचा टी 20I सामना

EXCERPT : India vs Bangladesh 3rd T20i: टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टी 20i मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे.

IND vs BAN: अनुभवी ऑलराउंडर निवृत्तीसाठी सज्ज, शनिवारी खेळणार अखेरचा टी 20I सामना
india vs bangladesh handshakeImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 9:33 PM

टीम इंडिया आणि बांगलादेश टी 20I मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. टीम इंडिया या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. अशात टीम इंडियाचा तिसरा सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप करण्याचा मानस असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश भारत दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे. या तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. हैदराबादमधील या सामन्याने एक दिग्गज ऑलराउंडर टी 20I क्रिकेटला कायमचा अलविदा करणार आहे. तो खेळाडू कोण आहे? आपण जाणून घेऊयात.

महमूदुल्लाहचा अखेरचा टी20I सामना

बांगलादेशचा दिग्गज आणि अनुभवी अष्टपैलू महमूदुल्लाह याचा हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियममधील अखेरचा टी 20I सामना असणार आहे. या सामन्यानंतर महमूदुल्लाह टी 20I क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. महमूदुल्लाह याने याबाबतची घोषणा ही दुसऱ्या टी 20I सामन्याच्या पूर्वसंध्येला अर्थात 8 ऑक्टोबर केली होती. त्यामुळे आता बांगलादेश टीमचा महमूदुल्लाहला विजयाने निरोप देण्याचा प्रयत्न असणार आहे. बांगलादेशला या प्रयत्नात किती यश मिळतं? याकडेही साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.

वनडेसाठी टी20iमधून ‘हिटविकेट’

महमूदुल्लाह याने याआधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटकडे अधिक लक्ष आणि वेळ देण्यासाठी आपण टी 20Iमधून निवृत्त होत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता महमूदुल्लाह आपल्या अखेरच्या टी20I सामन्यात कशी कामगिरी करतो? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.

टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.

बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.