IND vs BAN : आर अश्विनने बांगलादेशी गोलंदाजांचं घातलं ‘श्राद्ध’, पितृपक्षात दाखवले ‘कावळे’

भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. हा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. असं असताना आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. पण आर अश्विनने टीम इंडियाची लाज राखली. जिथे 200 धावा होतील की नाही अशी स्थिती होती तिथे 250 धावांचा पल्ला गाठला.

IND vs BAN : आर अश्विनने बांगलादेशी गोलंदाजांचं घातलं 'श्राद्ध', पितृपक्षात दाखवले 'कावळे'
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 3:54 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी भारत आणि बांग्लादेश यांच्यात महत्त्वपूर्ण कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरु आहे. पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर बांगलादेशचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. पहिल्या दिवशीच त्याची झलक दिसून आली. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने पहिल्या दोन सत्रात भारताची पिसं काढली. यशस्वी जयस्वाल वगळता आघाडीचा एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे अवघ्या 144 धावांवर 6 विकेट अशी स्थिती होती. त्यामुळे टीम इंडियाचं काय खरं नाही असंच वाटत होतं. पण लोकल बॉय आणि कसोटीत कायमच टीम इंडियाचा तारणहार राहिलेल्या आर अश्विनने भारताचा मोर्चा सांभाळला. त्याला रवींद्र जडेजाची उत्तम साथ लाभली. दोघांनी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. तसेच आर अश्विनने अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणलं. चेपॉकच्या खेळपट्टीचा चांगला अंदाज असल्याचं आर अश्विननं दाखवून दिलं. आर अश्विनने 58 चेंडूत अर्धशतक झळकावलं.

आर अश्विनने कसोटी क्रिकेटमधील 15 वं अर्धशतक झळकावलं. पण या अर्धशतकाचं महत्त्व काही वेगळंच आहे. जर त्याने डाव सावरला नसता तर कदाचित भारताचा डाव 200 धावांचा आत गुंडाळला गेला असता. तसेच बांगलादेशचा संघ भारतावर पहिल्याच डावात हावी झाला असता. आर अश्विनची ही खेळी त्याच्या वडिलांनी व्हिआयपी रुममध्ये बसून पाहिली हे विशेष..

आर अश्विन तसं पाहिलं तर गोलंदाजीसाठी म्हणूनच प्रसिद्ध आहे. पण त्याची फलंदाजी एखाद्या फलंदाजाला लाजवेल अशी आहे. आर अश्विनने यापूर्वी अशा इनिंग खेळल्या आहेत. यापूर्वी आर अश्विनने कसोटीत पाच शतकं ठोकली आहेत. टीएनपीएलमध्ये त्याने सलग तीन अर्धशतकं ठोकली असून संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं. आता टीम इंडियाच्या वाईट स्थितीत त्याने चांगली खेळी केली आहे.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.