World Cup : बाबर आझने याने कॅप्टनसी सोडावी का? कपिल देव यांच्या वक्तव्याची पाकिस्तानमध्ये चर्चा

Kapil Dev On Babar Azam : वर्ल्ड कपमधून बाहेर झालेला पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देव यांनी पाकिस्तानच्या कर्णधाराबाबत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

World Cup : बाबर आझने याने कॅप्टनसी सोडावी का? कपिल देव यांच्या वक्तव्याची पाकिस्तानमध्ये चर्चा
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 11:33 AM

मुंबई : वर्ल्ड कप 2023मध्ये भारतासह, दक्षिण आफ्रिक, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ सेमी फायनलमध्ये गेले आहेत. चारही संघ आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकमेकांना भिडतील. यंदाच्या स्पर्धेमधून वर्ल्ड कप विनर इंग्लंड, पाकिस्तान या दोन तगड्या संघाना सेमी फायनलमध्ये जागा मिळवता आली नाही. पाकिस्तान संघाचा शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यावर टीका होत आहे. अशातच बाबरच्या समर्थनार्थ कपिल देव यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले कपिल यादव?

बाबर आझम याने मागील सहा महिन्यांमागे संघाला नंबर वन बनवलं होतं. पण जेव्हा एखादा खेळाडू झिरो होतो त्यावेळी लोकांची त्याच्याविषयीची मत जाणून घेतलीत तर ९९ टक्के लोकं त्याला संघातून ड्रॉप करतील. पण तेच जर एखादा सामान्य खेळाडू शानदार खेळी करून जाईल त्यावेळी सगळे त्यासा सुपरस्टार बोलतात. पण कधीच चालू कामगिरीवरून कोणत्याही खेळाडूचं मूल्यमापन केलं जावू शकत नाही. कारण त्याने आधी कशा प्रकाराची कामगिरी केलीय ती जाणून घेतली पाहिजे, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.

तो खेळाडू कसा खेळतो, त्याच्यात किती जोश आणि टॅलेंट आहे हे पाहिलं पाहिजे. पहिल्या चेंडूवरही तुम्ही आऊट होऊ शकता. जगात असा कोणताही खेळाडू नाही जो पहिल्या चेंडूवर आऊट होऊ शकत नाही, असं कपिल देवने म्हटलं आहे. कपिल देवने बाबर आझमबाबत केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने १९८३ साली पहिला वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देवने भारतासाठी 131 कसोटी सामने आणि 225 एकदिवसीय सामने खेळले असून यामधील कसोटीमध्ये 5248 धावा आणि वन डे मध्ये 3783 धावा केल्यात. त्यासोबतच कसोटीमध्ये 434 विकेट आणि वन डे मध्ये 253 विकेट घेतल्या आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.