Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI Retention List IPL 2025: मुंबई इंडियन्सकडून 5 खेळाडू रिटेन, रोहितला सोडलं की ठेवलं? सर्वाधिक रक्कम या खेळाडूला

Mumbai Indians Retention Player List for IPL 2025 in Marathi: क्रिकेट चाहत्यांची अखेर प्रतिक्षा संपली आहे. मुंबई इंडियन्सने 5 खेळाडूंना आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी कायम ठेवलं आहे. पाहा या 5 जणांमध्ये कुणाचा समावेश आहे.

MI Retention List IPL 2025: मुंबई इंडियन्सकडून 5 खेळाडू रिटेन, रोहितला सोडलं की ठेवलं? सर्वाधिक रक्कम या खेळाडूला
Mumbai IndiansImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 6:09 PM

क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक तासांपासून आयपीएलच्या आगामी 18 व्या मोसमासाठी मुंबई इंडियन्स टीममध्ये कुणाला रिटेन केलं जाणार? याची प्रतिक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. मुंबई इंडियन्सने 18 व्या हंगामासाठी एकूण 5 खेळाडूंना रिटेन अर्थात कायम ठेवलं आहे. हे पाचही खेळाडू हे पहिल्या फळीतले आहेत. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सचे हे पाचही कॅप्ड खेळाडू आहेत. कॅप्ड खेळाडू म्हणजे आपल्या देशाकडून न खेळलेला खेळाडू.

मुंबईचे 5 खेळाडू कोण?

पलटणने कर्णधार हार्दिक पंड्या, माजी कर्णधार ‘हिटमॅन’ रोहित शर्मा, ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह, ‘मिस्टर 360’ सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे. नियमांनुसार, एका टीमला 18 व्या मोसमासाठी 6 खेळाडूंनाच रिटेन करण्याची परवानगी होती. त्यानुसार जास्तीत जास्त 5 कॅप्ड तर 2 अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी होती. मात्र मुंबईने 5 कॅप्टन आणि त्यातही कॅप्ड खेळाडूच कायम ठेवले आहेत. त्यामुळे मुंबई ऑक्शनमधून अनकॅप्ड खेळाडूची निवड करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जसप्रीत बुमराह सर्वात महागडा

मुंबईने या 5 खेळाडूंपैकी जसप्रीत बुमराह याला सर्वाधिक रक्कम दिली आहे. पलटणने जसप्रीत बुमराह याच्यासाठी सर्वाधिक 18 कोटी रुपये मोजले आहेत. तर हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांना प्रत्येकी 16 कोटी 35 लाख रुपये मोजून संघात कायम ठेवलं आहे. रोहित शर्मा याच्यासाठी 16 कोटी 30 लाख रुपये मोजण्यात आले आहेत. तर तिलक वर्माला 8 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत.

मुंबईचे ‘5 स्टार’ खेळाडू

पहिली यशस्वी टीम

दरम्यान मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पहिली टीम आहे. मुंबई इंडियन्सने 2013 पासून सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा याच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने ही कामगिरी केली आहे.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.