Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND 2nd Odi | नक्की कुठे चुकलं? कॅप्टन केएल पराभवानंतर म्हणाला…

SA vs IND 2nd Odi Highlights | टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात झोकात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला त्याच पद्धतीने पराभूत व्हावं लागलं.

SA vs IND 2nd Odi | नक्की कुठे चुकलं? कॅप्टन केएल पराभवानंतर  म्हणाला...
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 12:24 AM

ग्वेबेऱ्हा | क्रिकेट टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाला आहे. टीम इंडियाने पहिला सामना 8 विकेट्सने जिंकून दणक्यात सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने मुसंडी मारत जोरदार कमबॅक केलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवत हिशोब बरोबर केला. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाला 211 धावांवर ऑलआऊट केल्याने विजयासाठी 212 धावांच आव्हान मिळालं. हे आव्हान टोनो डी जॉर्जी याच्या नाबाद शतकाच्या जोरावर 43 व्या ओव्हरमध्यू पूर्ण केलं.

त्याआधी टीम इंडियाकडून सलामीवीर साई सुदर्शन आणि कॅप्टन केएल राहुल याने अर्धशतकी खेळी केली. सुदर्शनने 83 बॉलमध्ये 7 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 62 धावा केल्या. तर केएलने 64 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी सर्वाधिक 68 धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेच्या नांद्रे बर्गर याने 3 विकेट्स घेतल्या. तर ब्यूरेन हेंड्रिक्स आणि केशव महाराज या दोघांना 2-2 विकेट्स मिळाल्या. टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाज या सामन्यात अपयशी ठरले. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. ती संधी टीम इंडियाने गमावली. टीम इंडियाच्या पराभवानंतर केएल काय म्हणाला, हे जाणून घेऊयात.

केएल काय म्हणाला?

“सुरुवातीला थोडी मदत झाली. बॅटिंग करणं आव्हानात्मक होतं. पण आम्ही दोघे (केएल आणि साई सुदर्शन) सेट झालो. आम्ही पुढे गेलो असतो, तर 50-60 धावा आणखी जास्त झाल्या असत्या. त्यामुळे फरक पडला असता. आम्ही निर्णायक क्षणी विकेट गमावल्या”, असं केएल पराभवानंतर म्हणाला.

हे सुद्धा वाचा

“पहिल्या दहा ओव्हरमध्ये आम्हाला मदत मिळाली. आम्ही चांगलं खेळलो. मात्र ते सातत्य (पहिल्या डावात) आम्हाला कायम ठेवता आलं नाही. सातत्य राहिलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी असती.”, अशी खंत केएलने व्यक्त केली.”

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल(कॅप्टन आणि विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), टोनी डी झोर्झी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स आणि ब्यूरन हेंड्रिक्स.

शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?
ऐनवेळी शिंदेंना भाषणाची संधी तर दादांचं भाषणच नाही, रायगडावर काय घडलं?.
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं
शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ अन् जय भवानीचा गजर, शहांनी रायगड गाजवलं.
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे
उदयनराजेंच्या मागणीवर CM म्हणाले, त्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे.
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान
शिंदेशाही पगडी, कवड्याची माळ अन्..अमित शाहांचा किल्ले रायगडावर सन्मान.
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले...
उदयनराजेंच्या रायगडावर अमित शहांसमोर 'या' 5 मागण्या, म्हणाले....