IND vs SA | दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा?

India Tour Of South Africa | टीम इंडियाचा वनडे वर्ल्ड कपनंतर भरगच्च असा कार्यक्रम आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका दौरा करणार आहे. या दौऱ्याबाबत सर्वकाही जाणून घ्या.

IND vs SA | दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केव्हा?
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 7:42 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर क्रिकेट टीम इंडियाची युवा गँग ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. या मालिकेतील चौथा सामना हा शुक्रवारी 1 डिसेंबर रोजी रायपूरमध्ये होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. सूर्याच्या नेतृत्वात आतापर्यंत गोलंदाजीचा अपवाद वगळता टीम इंडियाने दमदार कामगिरी केली आहे.

भारतीय क्रिकेट संघ या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. या दौऱ्याला 10 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार, असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी घोषणा होणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अनुक्रमे टी 20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात प्रत्येकी 3 टी 20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका असणार आहे. तर 2 कसोटी सामने असणार आहे. आता बीसीसीआय एका झटक्यात तिन्ही मालिकांसाठी संघाची घोषणा करते की टप्प्याटप्याने संघ जाहीर करते, याकडे लक्ष लागून आहे.

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा

टी 20 मालिका

पहिला सामना, रविवार 10 डिसेंबर.

दुसरा सामना, मंगळवार 12 डिसेंबर.

तिसरा सामना, गुरुवार, 14 डिसेंबर.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा?

वनडे सीरिज

पहिली मॅच, रविवार 17 डिसेंबर.

दुसरी मॅच, मंगळवार 19 डिसेंबर.

तिसरी मॅच, गुरुवार 21 डिसेंबर.

कसोटी मालिका

पहिला सामना, 26 ते 30 डिसेंबर.

दुसरा सामना, 3 ते 7 जानेवारी.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.