‘प्लेअर ऑफ द मॅच’ विराट कोहलीला दिल्यानंतर संजय मांजरेकर यांचा संताप, म्हणाले…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विराट कोहलीने या सामन्यात 59 चेंडूंचा सामना केला आणि 76 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 176 धावांपर्यंत मजल मारता आली. पण विराटला हा सन्मान दिल्याने संजय मांजरेकर नाराज झाला आहे.

'प्लेअर ऑफ द मॅच' विराट कोहलीला दिल्यानंतर संजय मांजरेकर यांचा संताप, म्हणाले...
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 5:01 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या विजयानंतर 17 वर्षांनी भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं. भारताने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला झटपट विकेट गेल्याने विराट कोहलीने एक बाजू सावरून धरली. विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. पण या सामन्यात भारत विजयाच्या वाटेवर अनेक घडामोडी घडल्या. 30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता असताना जसप्रीत बुमराह,अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने जबरदस्त गोलंदाजी केली. तसेच भारताला 7 धावांनी विजय मिळवून दिला. हेन्रिक क्लासेन आणि डेविड मिलर खेळपट्टीवर असताना विजय मिळवणं कठीण होतं. त्यामुळे अशा स्थिती विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार दिल्याने संजय मांजरेकर यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोवर संजय मांजरेकर यांनी सांगितलं की, विराट कोहलीऐवजी हा पुरस्कार गोलंदाजाला द्यायला हवा होता.

संजय मांजरेकर यांनी सांगितलं की, “विराट कोहलीच्या खेळीमुळे हार्दिक पांड्याच्या वाटेला फक्त दोन चेंडू आले. भारतीय संघाची फलंदाजी चांगली होती. पण विराट कोहलीच्या खेळीमुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. जर भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली नसती तर भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला असता. कारण हेन्रिक क्लासेनने 23 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. सामना 90 टक्के दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. त्यामुळे कोहलीच्या जागेवर गोलंदाजाला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा होता. ”

दुसरीकडे, झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचं मत काहीसं वेगळं आहे. भारताने 176 धावांचं लक्ष्य दक्षिण अफ्रिकेसमोर ठेवली ही मोठी गोष्ट आहे. पण या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असता तर विराट कोहलीवर टीका झाली असती, असंही त्यांनी मान्य केलं. दरम्यान, विराट कोहलीने सामनावीराचा पुरस्कार हाती घेताच टी20 फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता विराट कोहली वनडे आणि कसोटी सामन्यात खेळताना दिसेल.

Non Stop LIVE Update
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर
माझा 'रन रेट' चांगलाय, पुढच्या लोकसभेला येथूनच लढतो - महादेव जानकर.
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस
T20 वर्ल्ड कप परेड :'एवढी मोठी गर्दी पाहून हृदय...,' काय म्हणाले पोलीस.
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली
निलेश लंके यांचे हमीभावासाठी आंदोलन, पत्नी आणि आईने चुल पेटविली.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजने संदर्भात मंत्री तटकरे यांनी दिले आदेश.
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले
'मराठ्यांनो आरक्षण मिळेपर्यंत मला...,'अश्रू गाळीत मनोज जरांगे म्हणाले.
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी
'नागपूरात जपानचा सेमी कंडक्टरचा प्रकल्प...,' काय म्हणाले नितीन गडकरी.
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका.