वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या शर्यतीतून पहिला संघ बाहेर! भारताचं टेन्शन वाढलं

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंजक वळणावर आली आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघाला फक्त चार सामने खेळायचे आहेत. त्यामुळे दोन सामन्यानंतर उपांत्य फेरीचं गणित काय ते स्पष्ट होणार आहे. तसं गणित पाहता पहिला संघ स्पर्धेबाहेर गेला असं म्हणायला हरकत नाही.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या शर्यतीतून पहिला संघ बाहेर! भारताचं टेन्शन वाढलं
Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 7:52 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अ गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आहे. या गटातून टॉपला असलेल्या दोन संघांना उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे एका संघाने चार आणि एका संघाने तीन सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीचं स्थान पक्कं होईल. या शर्यतीत आता भारत आणि श्रीलंका या दोन संघाची वाट बिकट झाली आहे. श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. साखळी फेरीतील चार पैकी दोन सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत उर्वरित दोन सामन्यांवर उपांत्य फेरी गाठणं कठीण आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेला 31 धावांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 6 विकेट आणि 34 चेंडू राखून पराभूत केलं आहे. त्यामुळे श्रीलंकेचा नेट रनरेट खूपच खाली गेला आहे. उर्वरित दोन सामन्यात त्याची भरपाई करणं खूपच कठीण आहे. अशा स्थितीत श्रीलंका हा संघ स्पर्धेतून बाहेर गेलेला पहिला संघ ठरला, असं म्हणायला हरकत नाही. श्रीलंकेचे उर्वरित दोन सामने भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध आहेत.

श्रीलंकेने उर्वरित दोन सामन्यात विजय जरी मिळवला तरी इतर संघांच्या कामगिरीवर सर्वकाही अवलंबून आहे. पण नेट रनरेटचं गणित खूपच किचकट दिसत आहे. त्यामुळे त्यातून भरपाई होणं कठीण आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात श्रीलंकेला मोठ्या विजयाची गरज आहे. पण तसं काही होईल असं वाटत नाही. सध्या न्यूझीलंडचा संघ 2 गुण आणि +2.900 नेटच रनरेटसह पहिल्या स्थानवर आहे, ऑस्ट्रेलिया 2 गुण आणि +1.908 नेट रनरेटसह दुसऱ्या, पाकिस्तान 2 गुण आणि +1.550 नेट रनरेटसह तिसऱ्या, श्रीलंका 2 सामन्यात पराभूत होत 0 गुणांसह -1.667 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर, तर भारत 0 गुणांसह -2.900 सर्वात शेवटी आहे.

श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात पाचवा सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. श्रीलंकेने 20 षटकात 7 गडी गमवून 93 धावा केल्या आणि विजयासाठी 94 धावा दिल्या. दरम्यान ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 गडी गमवून 14.2 षटकात पूर्ण केलं.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.