Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Odi Cricket: रोहित शर्मा-विराट कोहली 6 महिन्यांनी वनडेत खेळणार, कारण काय?

Rohit Sharma-Virat Kohli Team India: टीम इंडियाचे आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली 6 महिन्यांनी एकदिवसीय मालितेत खेळताना दिसणार आहेत.

Odi Cricket: रोहित शर्मा-विराट कोहली 6 महिन्यांनी वनडेत खेळणार, कारण काय?
virat kohli and rohit sharmaImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 9:38 PM

रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 17 वर्षांनंतर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून दिली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने ऐतिहासिक विजयानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी थेट श्रीलंके विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून टीम इंडियात कमबॅक केलं. या दरम्यान टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने झिंबाब्वे आणि श्रीलंके विरुद्ध टी 20i मालिका खेळली. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताला श्रीलंके विरुद्ध 0-2 अशा फरकाने मालिका गमवावी लागली. त्यामुळे भारतीय चाहत्यांना मोठा झटका लागला. तसेच श्रीलंकेला टीम इंडिया विरुद्ध 27 वर्षांनंतर द्विपक्षीय मालिका जिंकण्यात यश आलं.

उभयसंघातील पहिला सामना हा टाय झाला. त्यानंतर श्रीलंकेने सलग दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली. श्रीलंकेने 1997 नंतर टीम इंडिया विरुद्ध विजय मिळवला. टीम इंडियाला तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत राखण्याची संधी होती. मात्र 7 ऑगस्टला झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध 110 धावांच्या फरकाने मानीहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. भारताने यासह 0-2 अशा फरकाने मालिका गमवावी लागली. या मालिकेत रोहित शर्माने उल्लेखनीय कामगिरी केली. मात्र काही अपवाद वगळता इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. या मालिकेनंतर आता विराट आणि रोहित हे दिग्गज तब्बल 6 महिन्यांनी एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.

भारताची 2024 मधील एकमेव एकदिवसीय मालिका पार पडली आहे. आता भारत नववर्षात 2025 मध्ये इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही मालिका असणार आहे. इंग्लंड जानेवारी 2025 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंड टीम इंडिया विरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर भारताने अखेरचा वनडे सामना हा 7 जुलै रोजी खेळला आहे. अशाप्रकारे रोहित आणि विराट हे आपला पुढील एकदिवसीय सामना हा 6 महिन्यांनी खेळणार आहेत.

भारताच्या पुढील एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

इंग्लंड विरुद्ध इंडिया, पहिला सामना, 6 फेब्रुवारी, नागपूर

दुसरा सामना, 9 फेब्रुवारी, कटक

तिसरा सामना, 12 फेब्रुवारी, अहमदाबाद.

'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.