Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…म्हणून के. एल. राहुलला संघात ठेवलंय’, अखेर रोहित शर्माने केला खुलासा

गेल्या अनेक दिवसांपासून राहुलला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही कसोटीमध्ये राहुल अपयशी ठरला. यावरून त्याला धारेवर धरलं जात असताना कर्णधार रोहित शर्माने राहुलचं समर्थन केलं आहे. इतकंच नाहीतर संघामध्ये राहुलला का स्थान दिलं आहे याबाबतही खुलासा केला आहे.

'...म्हणून के. एल. राहुलला संघात ठेवलंय', अखेर रोहित शर्माने केला खुलासा
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 11:40 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मालिकेमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. दोन्ही कसोटीमध्ये आर. आश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या दमदार बॉलिंगच्या प्रदर्शनाच्या जोरावर कांगारूंवर दोन्ही सामन्यात सहज विजय मिळवता आला. भारतासाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे ती म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर के. एल. राहुल. कारण गेल्या अनेक दिवसांपासून राहुलला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही कसोटीमध्ये राहुल अपयशी ठरला. यावरून त्याला धारेवर धरलं जात असताना कर्णधार रोहित शर्माने राहुलचं समर्थन केलं आहे. इतकंच नाहीतर संघामध्ये राहुलला का स्थान दिलं आहे याबाबतही खुलासा केला आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा-

गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या फॉर्मवरून खूप चर्चा होताना दिसत आहे. पण टीम मॅनेजमेंट म्हणून राहुलच्या फॉर्मला पाहता त्याच्यातील क्षमतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जर एखाद्या खेळाडूकडे क्षमता असेल तर त्याला जास्तीत जास्त संधी दिल्या जात असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या पीचवर खेळता तेव्हा तुम्हाला धावा करण्यासाठी मार्ग काढावा लागतो. प्रत्येक फलंदाजाची स्पिनर्सविरूद्द खेळण्याची पद्धत वेगळी असते. कोणता खेळाडू कसा धावा करतो आमच्यासाठी महत्त्वाचं नसून सर्वजण एकत्र येऊन जास्तीत जास्त धावा कशा काढता येतील हे महत्त्वाचं असल्याचंही रोहितने सांगितलं.

कांगारूंविरूद्धच्या उर्वरित 2 कसोटी सामन्यांमध्ये निवड समितीने विश्वास ठेवत त्याला स्थान दिलं आहे. राहुलच्या संघात असण्यामुळे नेटकऱ्यांनी निवड समितीच्या या निर्णयावर ताशेरे ओढले. कारण राहुलच्या जागी दुसऱ्या युवा खेळाडूला संधी दिली तर ते भारताच्या फायद्याचं ठरेल अशा अनेक प्रतिक्रिया बीसीसीआयने संघाची घोषणा केल्यावर आल्या. सामना संपल्यावर काही तासांमध्येच बीसीसीआयने वनडे आणि कसोटी संघांची घोषणा केली होती.

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर चौथी कसोटी, 9-13 मार्च,

वनडे सीरिज पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

उर्वरित 2 कसोटींसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप
माझ्यावरचा हल्ला रोहित पवारांनीच केला; पडळकरांचा खळबळजनक आरोप.
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा
'रात्री एक्स्प्रेस हायवेवर बोलवलं अन्...' दादांनी सांगितला 'तो' किस्सा.
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?
रायगडावरील वाघ्या कुत्र्यावरून वाद कायम, सरकार सोक्षमोक्ष करणार?.
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले
माझ्या नावाची अडचण असेल तर पत्र लगेच मागे घेतो..; भास्कर जाधव चिडले.
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?
हातात तिरंगा अन् विधानभवन परिसरातील झाडावर 'त्याचं' आंदोलन, मागणी काय?.
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू
'सौगात ए मोदी'चं आम्ही स्वागत करतो, पण..; राऊतांनी घेतली भाजपची बाजू.