Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Atal Pension Yojana | दरमहा फक्त 210 रुपये जमा करा आणि मिळवा वार्षिक 60,000 रुपये पगार

Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजनेत तुम्हाला किमान 20 वर्षे पैसे जमा करावे लागतील. वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळेल.

Atal Pension Yojana | दरमहा फक्त 210 रुपये जमा करा आणि मिळवा वार्षिक 60,000 रुपये पगार
अटल पेन्शन योजना Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 8:02 AM

Atal Pension Yojana | केंद्र सरकारची (Central Government) अल्पावधीतच सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना (APY) ही होय. आयुष्याची संध्याकाळ सुखात जावी यासाठी ही योजना लाभधारकांना मदत करते. या योजनेतंर्गत अल्पबचत करुन तुम्हाला उतार वयात महिन्याचा औषधांचा खर्च भागविता येतो. आतापासूनच या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर योजनेतंर्गत तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. ही योजना विविध बँक (Bank) अथवा पोस्ट कार्यालयातही (Post Office) उपलब्ध आहे. या योजनेचे अॅप ही उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीची अद्ययावत माहिती तुम्हाला मिळते. तुम्हीही भविष्यासाठी अधिक चांगल्या योजनेच्या शोधात असाल तर अटल पेन्शन योजना हा सर्वात शानदार पर्याय ठरू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळते. केंद्र सरकारच्या या योजनेत देशातील नागरीक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक(Investment) करत आहेत. या योजनेसाठी देशातील कोणताही नागरिक अर्ज करू शकतो.

योजनेत वयाची अट

अटल पेन्शन योजनेत 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. या योजनेत किमान 20 वर्षे मासिक पैसे जमा करणे बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात किती योगदान द्यायचे हे लाभार्थ्यांच्या वयावर अवलंबून असते.

अटल पेन्शन योजनेचा लाभ

किमान 18 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतो. वयाच्या 18 व्या वर्षी, जास्तीत जास्त 5000 महिन्यांच्या पेन्शन मर्यादेसाठी, त्याला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. वयाच्या 25 व्या वर्षी जोडल्यास योगदान दरमहा 376 रुपये, तर 30 वर्षे वय असलेल्यांसाठी 577 रुपये, 35 वर्षांच्या लोकांसाठी 902 रुपये आणि 39 वर्षे वयाच्यांसाठी 1318 रुपये योगदान आहे. पती-पत्नी असे संयुक्त खाते उघडता येते. तसेच त्यांना वेगवेगळी खाती ही उघडता येतात. त्यानुसार त्यांना हे योगदान वेगळे द्यावे लागेल.

हे सुद्धा वाचा

आयकर सूट

या योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना प्राप्तीकर खात्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. यात कमीत कमी 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास पेन्शनची रक्कम वारसदाराला देण्यात येते. या योजनेअंतर्गत तुम्हाला किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत, विमाधारकाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. या योजनेत खातेदाराला दरवर्षी 12 हजार रुपये प्रीमियम जमा करावा लागतो. लाभधारकाला विम्याचे दोन लाख रुपयांचे संरक्षण मिळते. या योजनेचा लाभ 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती घेऊ शकते. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. खातेधारकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळेल. हा विमा १ जून ते ३१ मे पर्यंत वैध असतो.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.