Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank : बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात आता मोठा बदल..रोज थांबावे लागेल अर्धा तास जास्त..कारण काय?

Bank : बँकेतील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आता वाढणार आहे..

Bank : बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात आता मोठा बदल..रोज थांबावे लागेल अर्धा तास जास्त..कारण काय?
कामाचे तास वाढणारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 5:07 PM

नवी दिल्ली : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Employees) रोजच्या तासात आता बदल होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात (Working Hour) बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांना रोज अर्धा तास (Half Hour) अधिक थांबावे लागणार आहे. त्यामागे कर्मचाऱ्यांचा फायदा आहे..

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाने (All India Bank Employees Association) इंडियन बँक असोसिएशनला एक पत्र पाठविले आहे. त्यात कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढविण्याचा मुद्दा समोर आला आहे.

कर्मचारी आठवड्यातील दोन दिवस सुट्टी मिळण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर कामाच्या वेळापत्रकात बदल करत प्रत्येक दिवशी 30 मिनिटे त्यांना अधिक काम करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी ही त्यासाठी होकार भरला आहे.

हे सुद्धा वाचा

या नवीन प्रस्तावानुसार, कर्मचाऱ्यांना आता सध्याच्या वेळेपूर्वी बँकेत अर्धा तास अगोदर हजर रहावे लागेल. तसेच कस्टमर केअर सर्व्हिस अथवा नॉन कॅश ट्रॉन्झक्शनसाठी प्रत्येक दिवशी अतिरिक्त 30 मिनिटे अधिक द्यावे लागतील.

या योजनेनुसार, बँका आता सकाळी 9.45 ऐवजी 9.15 वाजता सुरु होणार आहेत. तर बँक बंद होण्याची वेळ आता 4.45 अशी असेल. या काळात बँकेचे कामकाज सुरु राहील. ग्राहकांना आता सकाळी लवकर बँकेतील व्यवहार पूर्ण करता येतील.

भारतीय बँक संघाने अद्याप या निर्णयाला मंजुरी दिली नाही. परंतु, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा मंजूर झाल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.

प्रश्न शनिवारच्या कामाचा आहे. महिन्यातील दोन शनिवार बँका बंद असतात. तर दोन शनिवार कामकाज सुरु असते. त्यादिवशीचा मुद्दा सोडविण्यात आला तर लवकरच बँकांच्या कामकाजाची वेळ बदलणार आहे.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
'ते डबडं कुठं पुरून ठेवलंय...', औरंगजेब कबरीवरून जरांगेंची CM वर टीका
'ते डबडं कुठं पुरून ठेवलंय...', औरंगजेब कबरीवरून जरांगेंची CM वर टीका.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.