AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना शिमला ना मसूरी, दिल्लीच्या थंडीनं दातखिळी बसायची वेळ, IMD चा पुढचा अंदाज काय?

उत्तर भारतात थंडीच्या तीव्र लाटेमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. थंडीमुळे पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका आल्याने 25 जणांचा मृत्यू झाला.

ना शिमला ना मसूरी, दिल्लीच्या थंडीनं दातखिळी बसायची वेळ, IMD चा पुढचा अंदाज काय?
Image Credit source: social media
| Updated on: Jan 07, 2023 | 9:16 AM
Share

नवी दिल्लीः उत्तर भारत (North India), हरियाणा, पंजाब, दिल्लीसहित (Delhi) उत्तर भारतात थंडीच्या लाटेचा प्रकोप सुरूच आहे. कुडकुडणाऱ्या थंडीनं नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झालाय. रस्त्यावर ठिक-ठिकाणी लोक शेकोट्या पेटवत आहे. एरवी देशात सर्वाधिक थंडी असणाऱ्या ठिकाणांमध्ये डलहौजी, शिमला, डेहराडून आणि नैनीताल यांचा समावेश होतो. पण यंदा दिल्लीच्या पाऱ्यानं सर्वाधिक घसरण घेतली आहे. थंडीसोबत दाट धुक्यांनी वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. खराब हवामानामुळे ट्रेन लेट होत आहेत. विमानांचे उड्डाणही विलंबाने होत आहेत.

दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी थंडीच्या लाटेचा तडाखा बसतोय. नैऋत्य दिल्लीतल्या आयानगर येथील किमान तापमान तब्बल 1.8 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलंय.

भारतीय हवामान शास्त्र विभाग अर्थात IMD च्या अंदाजानुसार, आजपासून म्हणजेच ७ जानेवारीपासून थंडी थोडी कमी होईल. जम्मू काश्मीरमध्ये किमान तापमानात थोडी सुधारणा होईल. खोऱ्यातही थंडीचा भीषणपणा काहीसा कमी होईल.

दिल्लीत कडाक्याची थंडी

दिल्लीतल्या सफदरजंग या प्रमुख वेधशाळेत किमान तापमान 4 अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले. डलहौजी (8.7 अंश सेल्सियस), धर्मशाळा (5.4 अंश सेल्सियस), शिमला (6.2 अंश सेल्सियस), डेहराडून (4.4 अंश सेल्सियस), मसूरी (6.4 अंश सेल्सियस) आणि नैनीताल (6.5 अंश सेल्सियस)पेक्षाही कमी आहे.

राजस्थानच्या सीकर येथील फतेहपूर मध्ये किमान तापमान 0.7 अंश सेल्सियस एवढे नोंदवले. त्यानंतर चुरू येथे 1 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

उत्तर भारतात थंडीच्या लाटेचे 25 बळी

उत्तर भारतात थंडीच्या तीव्र लाटेमुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. थंडीमुळे पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका आल्याने 25 जणांचा मृत्यू झाला. 17 जण वैद्यकीय उपचार करण्यापूर्वीच मरण पावले. उत्तर प्रदेशातल्या कार्डिओलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये हृदयविकारग्रस्त रुग्णांची संख्याही अचानक वाढलेली दिसून आली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.