Abhishek ghosalkar case | माझ्यावर अन्याय झालाय, फसवलं गेलंय, मॉरीसच्या अंगरक्षकाने केला दावा

शिवसेनेचे दहीसरचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणात वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात आरोपी मॉरीस याने स्वत: आत्महत्या केली याची चर्चा सुरु असताना या प्रकरणात दोघांची सुपारी देऊन हत्या तर झाली नाही ना असा सवाल ठाकरे यांनी करीत चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात मॉरीस याने त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे रिव्हॉल्वर वापरल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी अमरेंद्र मिश्रा याला 13 तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

Abhishek ghosalkar case | माझ्यावर अन्याय झालाय, फसवलं गेलंय, मॉरीसच्या अंगरक्षकाने केला दावा
| Updated on: Feb 10, 2024 | 3:50 PM

मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : दहीसर येथील शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुल लाईव्ह दरम्यान गोळीबार करीत त्यांची हत्या करणाऱ्या गुंड मॉरीस नरोव्हा याने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. मात्र या प्रकरणात मॉरीस याच्या आत्महत्या आणि एकंदर प्रकरणावर शिवसेना नेते माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संशय व्यक्त केला आहे. संतापाच्या भरात एखादे कृत्य व्यक्ती करु शकतो. परंतू त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकत नाही. कोणी या दोघांची सुपारी देऊन हत्या तर केली नाही ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मॉरीस याच्याकडे स्वत:चे रिव्हॉल्वर नव्हते. त्याने त्याच्या अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याचे रिव्हॉल्वर वापरून ही हत्या केल्याचे म्हटले जात आहे. परंतू मॉरीस याला सुरक्षेची एवढी काय गरज असाही सवाल ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला अवैध शस्र बाळगल्याप्रकरणात अटक झाली आहे. त्याने मुझपर अन्याय हुआ है, मुझे फसाया गया है असे म्हटले आहे. मिश्रा याला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.