Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिंदे-भाजपची बेकायदेशीर राजवट अन्... आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर काय केला गंभीर आरोप?

मिंदे-भाजपची बेकायदेशीर राजवट अन्… आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर काय केला गंभीर आरोप?

| Updated on: Jan 02, 2024 | 11:02 PM

'मिंदे-भाजपची बेकायदेशीर राजवट महालक्ष्मी, वरळी येथील रेसकोर्स ताब्यात घेऊ इच्छित आहे. असं मला ऐकायला मिळतंय. शिंदेंच्या बिल्डर मित्राकडून व्यवस्थापनाला धमकावण्याचा प्रयत्न', महालक्ष्मी रेसकोर्स येथील जागा सरकार बळकावतंय. इतकंच नाहीतर सरकार ही जागा बळकावून कंत्राटदाराला देतंय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केलाय.

मुंबई, २ जानेवारी २०२४ : महालक्ष्मी रेसकोर्स येथील जागा सरकार बळकावतंय. इतकंच नाहीतर सरकार ही जागा बळकावून कंत्राटदाराला देतंय, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी सरकारवर केलाय. यासह शिंदेंच्या बिल्डर मित्राकडून व्यवस्थापनाला धमकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ट्वीट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी हा आरोप केलाय. ‘मिंदे-भाजपची बेकायदेशीर राजवट महालक्ष्मी, वरळी येथील रेसकोर्स ताब्यात घेऊ इच्छित आहे. असं मला ऐकायला मिळतंय. शिंदेंच्या बिल्डर मित्राकडून व्यवस्थापनाला धमकावण्याचा प्रयत्न असून ज्यामुळे काही जागा रेसिंगसाठी दिली जाईल आणि बाकीची जागा तथाकथित विकासासाठी काढून घेतली जाईल.’, असे आदित्य ठाकरे म्हणाले तर व्यवस्थापन अशा जमिनी बळकावणाच्या कृत्यांविरोधात उभे राहिल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Jan 02, 2024 11:02 PM