AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरूच राहणार!; या नेत्याचा सरकारला इशारा

जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आमचं आमरण उपोषण सुरूच राहणार!; या नेत्याचा सरकारला इशारा

| Updated on: Mar 27, 2023 | 3:36 PM

Ahmednagar : पारनेर तालुक्यातील काही विकासकामांना स्थगिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून सरकारवर टीका करण्यात आली आहे.

अहमदनगर : जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचं अमरण उपोषण सुरूच राहील. माझ्या मतदारसंघात 30 बंधाऱ्याला मी मंजुरी घेतली होती. पण आताच्या सरकारनं त्याला स्थगिती दिली आहे. कामांना स्थगिती देणं चुकीचं आहे. इतर तालुक्यातील कामांना दिलेली स्थगिती उठवण्यात आली आहे. पण माझ्या मतदारसंघातली स्थगिती का उठवली गेली नाही. अधिवेशनातदेखील आम्ही मागण्या केल्या. पण आमच्या मागण्या मान्य केल्या गेल्या नाहीत. सरकारकडून विकास निधी रोखला जात आहे. सरकार चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत, असं म्हणत आमदार निलेश लंके यांनी सरकारवर टीका केली आहे.