Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

19 बंगल्याबाबत Rashmi Thackeray यांना विचारा, आणि दोन्ही जोड्याने मारा - Kirit Somaiya

19 बंगल्याबाबत Rashmi Thackeray यांना विचारा, आणि दोन्ही जोड्याने मारा – Kirit Somaiya

| Updated on: Feb 17, 2022 | 12:01 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019मध्ये पत्रं लिहिलं लिहून माझ्या नावावर बंगले करा असं सांगितलं होतं. बंगले मी दाखवणार नाही. तुम्ही तिथे बंगले आहेत हे कायदेशीररित्या प्रुव्ह केलं. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे 19 बंगले हरवले आहेत. रश्मी ठाकरे यांनी जानेवारी 2019मध्ये पत्रं लिहिलं लिहून माझ्या नावावर बंगले करा असं सांगितलं होतं. बंगले मी दाखवणार नाही. तुम्ही तिथे बंगले आहेत हे कायदेशीररित्या प्रुव्ह केलं. मी तिथे बघायला गेलो. मला बंगले सापडले नाही. त्याबद्दल मी तक्रार केली आहे. त्यामुळे या बंगल्याबाबत ठाकरे कुटुंबांनी बोलावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर या बंगल्याबाबत का बोलत नाहीत? संजय राऊतच (sanjay raut) या बंगल्यांबाबत का बोलत आहेत? असा सवाल करतानाच मला चप्पलेने मारणार ते ठिक आहे. पण हरवलेल्या 19 बंगल्यावर बोला. त्याचे उत्तर द्या, असं आव्हानच भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी शिवसेनेला दिलं आहे. तसेच राऊत यांनी केलेले सर्व आरोप सोमय्या यांनी फेटाळून लावले आहेत. माझ्याविरोधातील कागदपत्रे असतील तर त्यांनी ती मीडियाला द्यावीत, असं आव्हानही त्यांनी राऊत यांना दिलं.