‘मविआ’ला 35 जागा तर ‘इंडिया’ला बहुमत, शरद पवारांनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

इंडिया आघाडीला 240-260 जागा मिळतील आणि केंद्रात सत्ताबदल होणार असल्याचे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या संवादात पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिया आघाडीला 240-260 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. बघा नेमकं काय म्हणाले?

'मविआ'ला 35 जागा तर 'इंडिया'ला बहुमत, शरद पवारांनंतर पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
| Updated on: May 15, 2024 | 11:10 AM

येत्या ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र आतापर्यंत तीन नेत्यांनी जागांचा अंदाज वर्तवला आहे. अशातच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याचा थेट दावाच केला आहे. महाराष्ट्रसह देशात अजून काही मतदानाचे टप्पे बाकी असताना ४ जूनच्या निकालापूर्वीच भाकितं सुरू झाली आहेत. नवा दावा काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांसह रोहित पवारांनीही किती जागा मिळणार याचा आकडा घोषित केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळणार असल्याचा दावा केला. म्हणजेच महायुतीला १३ ते १८ जागा मिळू शकतात. शरद पवार यांनी सांगितले महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागा आणि महायुतीला १३ ते १८ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. राज्यात आणखी एका टप्प्यातील मतदान बाकी असताना मविआ नेत्यांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय. बघा स्पेशल रिपोर्ट…

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.