Devendra Fadnavis : ठाकरे गट वेळकाढूपणा करतंय, फडणवीसांची सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Feb 17, 2023 | 4:53 PM

सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी यावेळी ठाकरे गटावर टीका केली आहे.

Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘कोर्टाने सांगितलं की, राबिया प्रकरणातील निर्णयावर पूनर्विचार व्हावा म्हणून ७ जजेसकडे पाठवा ही मागणी सयुक्तिक नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेळकाढूपणा करर आहे. त्यामुळे त्यांची ही मागणी आहे. वर्षभर निकालच लागू नये म्हणून हे त्यांचं धोरण आहे. याचा अंतिम निकाल लवकरच लागेल. जो काही निर्णय मिळालेला आहे त्यावर समाधानी आहे.’

‘संजय राऊत काहीही आरोप करु शकतात. संजय राऊत दिवसातून ३ वेळा आरोप करतात. सकाळी काय आरोप करतात हे संध्याकाळी त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यावर मी काय बोलणार,’ असा टोला देखील देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

संजय राऊत काय म्हणाले

लोकं ठरवतील शिवसेना कोणती आहे. जर न्यायालयाला किंवा निवडणूक आयोगाला निर्णय घेतांना काही अडचण असेल. दबाव असतात बाकी काय असतं. निवडणुका घेऊन आणि कौल घेणं अशावेळी हा एकच मार्ग असतो असं संजय राऊत म्हणाले.