म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली… देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?

धारावीतील प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मागच्याचवेळी अनधिकृत बांधकाम तोडण्यात येणार होतं. पण ईदनंतर आम्हीच ते बांधकाम तोडू असं मशीद कमिटीने सांगितलं होतं. त्यामुळे तेव्हा कारवाई झाली नाही. पण ईद झाल्यानंतरही काहीच हालचाल न झाल्याने आज ही कारवाई केली जात होती, असं फडणवीस यांनी सांगितलं.

म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया काय?
| Updated on: Sep 21, 2024 | 4:31 PM

अनधिकृत बांधकामांसदर्भात न्यायालयाचे निर्णय आहेत. अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात मागच्या वेळेलाही न्यायालयाने सांगितले होते. तेव्हाही बीएमसीने कारवाई सुरू केली होती. तेव्हा ईद झाल्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात येईल, अशी विनंती करण्यात आली होती. आज देखील बीएमसीची टीम त्या ठिकाणी गेली होती. तेव्हा त्यांनी (मशीद कमिटी) स्वतः सांगितले की, पुढील चार-पाच दिवसात आम्ही अतिक्रमण काढतो. त्यामुळे टीम परत आली आहे. कुठल्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये. मशीद कमिटीने महापालिकेला ज्या प्रमाणे लिहून दिलंय, त्याप्रमाणे ते कार्यवाही करतील याचा विश्वास आहे, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. धारावीत मशिदीचा अनधिकृत भाग हटवण्यासाठी महापालिकेची टीम गेली होती. त्यावेळी पालिकेच्या टीमवर दगडफेक करण्यात आली. स्थानिकांनी रास्ता रोकोही केला. त्यामुळे धारावीत तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते.

 

Follow us
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्...
जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रकृती बिघडली, चालताही येईना अन्....