केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे देशाच्या शेतकऱ्यांचे नुकसान – शरद पवार
नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी शेकऱ्यांच्या व्यथा मांडत सरकारवर कठोर टीका केली आहे. कांद्याच्या संदर्भात केंद्राने घेतलेल्या निर्णयाला शरद पवार यांनी विरोध केला आहे. शिवाय अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं.. त्यावर देखील सरकराने ठोस पाऊल उचलली नाहीत... यावर देखील शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई | 11 डिसेंबर 2023 : चांदवड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर संबोधित करताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर कठोर टीका केली. शिवाय शेतकऱ्यांच्या व्यथा दिल्लीत मांडणार असं वक्तव्य देखली शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं. नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी आहे. त्याला 2 पैसे मिळण्याची संधी येत असते. पण केंद्राने घेतलेल्या निर्णयामुळे देशाच्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. बाजार भाव देखील पडले, बाहेर देशात जाणारा माल देखील अडकला आणि त्यांचं नुकसान झालं. संपूर्ण देशातील निर्यात थांबवली आहे, काही देशांनी याचा फायदा घेतला होता. कांद्याची गरज आहे, पण भारत सरकार लोकांच्या दबावामुळे बंदी घालत आहे. अतिवृष्टीने जे नुकसान झालं तेव्हा पाहणी करत असतांना त्यांनी 2 दिवसात मदत करू सांगितले पण दहा दिवस झाले अजून मदत झाली नाही. 7 डिसेंबर रोजी बंदी घातली. याची मोठी किंमत शेकऱ्यांना मोजावी लागत आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, मार्ग काढला पाहिजे… असं देखील शरद पवार म्हणाले.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले

धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
