तर काँग्रेसऐवजी ठाकरे अन् पवार एकत्र लढणार? मविआचा फॉर्म्युला 5 राज्यांच्या निकालात दडलाय?
मविआतील फॉर्म्युल्यावर ३ डिसेंबरनंतर काँग्रेस महाराष्ट्रातील जागांवर अधिकृतपणे दावा करणार आहे. याचं कारण म्हणजे ५ राज्यांचे निकाल त्यांच्यासाठी चांगले ठरले तर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते. मविआत काँग्रेसला अपेक्षित जागा न मिळाल्यास ठाकरे गट आणि शरद पवार गटही एकत्रित लढू शकेल.
मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ | महाविकास आघाडीमध्ये संभाव्य फॉर्म्युल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेस जागा वाटपसाठी ३ डिसेंबरची वाट पाहतंय. कारण ५ राज्यांच्या निकाल लागल्यानंतरच यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये संभाव्य फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. मात्र यामध्ये काँग्रेस निरूत्साही दिसतंय. सुत्रांच्या माहितीनुसार, ३ डिसेंबरनंतर काँग्रेस महाराष्ट्रातील जागांवर अधिकृतपणे दावा करेल. याचं कारण म्हणजे ५ राज्यांचे निकाल त्यांच्यासाठी चांगले ठरले तर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते. म्हणून काँग्रेस यासंदर्भात डिसेंबरमध्ये निर्णय होईल असे म्हणताय. मविआत काँग्रेसला अपेक्षित जागा न मिळाल्यास ठाकरे गट आणि शरद पवार गटही एकत्रित लढू शकेल. प्राथमिक माहितीनुसार, मविआतला संभाव्य फॉर्म्युल्यानुसरा, ठाकरे गट १९-२०, काँग्रेस १३-१५, राष्ट्रवादी १०-११ जागा लढवू शकते. मात्र या संभाव्य फॉर्म्युल्यावर फेरविचाराला बळ मिळावं, म्हणून काँग्रेस ३ डिसेंबरनंतर दावा करणार आहे.

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न

'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप

'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज

सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
