Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा अन् जयंत पाटील भावूक, नेमक्या काय होत्या त्यावेळी भावना?

शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा अन् जयंत पाटील भावूक, नेमक्या काय होत्या त्यावेळी भावना?

| Updated on: Mar 01, 2024 | 6:03 PM

‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम‘ या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुलाखत झाली. यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा भावूक झाले होते... यावर काय म्हणाले, जयंत पाटील बघा UNCUT मुलाखत

मुंबई, १ मार्च २०२४ : ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम‘ या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुलाखत झाली. यावेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा भावूक झाले होते. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. “मी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम करत होतो. शरद पवारांनी पक्ष ज्यावेळेला वेगळा करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पक्ष सोडून जे आले त्यांच्यामध्ये मी नव्हतो. कारण पक्ष बदलू नये या मताचा मी होतो. पण त्यानंतर आग्रह झाला, चर्चा झाल्या. या पक्षात शरद पवार यांचं नेतृत्व आहे म्हणून मी या पक्षात आलो. आता 25 वर्षे त्यांच्या नेतृ्त्वाखाली काम करताना त्यांच्या नेतृत्वाची एवढी सवय झाली की, त्यांच्याशिवाय राजकारण करणं अशक्य आहे. तेच जर निघून जायला लागले तर मग हे 25 वर्षे आम्ही सगळ्यांनी खर्च केले ते व्यर्थ आहे, अशी भावना होती”, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. “ज्यांना पक्ष चालवायची इच्छा होती त्या सर्वांना द्यावं, अशी माझी भूमिका होती”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

Published on: Mar 01, 2024 06:03 PM